डॉ. उदय कुडाळकर यांचे प्रतिपादन : छ. शाहू प्रतिष्ठान इब्रामपूर पेडणे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
प्रतिनिधी /पेडणे
मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित , राजनीतिज्ञ , लेखक, समाज सुधारक ,स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणाया महायोद्धय़ाने उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटविली, असे प्रतिपादन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. उदय कुडाळकर यांनी केले इब्रामपूर येथे केले.
छत्रपती शाहू प्रतिष्ठान इब्रामपूर पेडणे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळय़ात प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ. कुडाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव भारत बागकर, सातेरी विद्यामंदिरचे चेअरमन राजाराम गवस, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, युगनायक संस्थेचे अध्यक्ष ओंकार गोवेकर, एस. के. जाधव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना कळंगुटकर, छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल इब्रामपूरकर, छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक परेश परवार आदी उपस्थित होते.
डॉ. उदय कुडाळकर पुढे म्हणाले की, आंडेकरांनी जनतेला आणि ज्ञानातून प्रकाश दिला. तसेच स्वतःच्या विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी केला. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज आहे, असे डॉ. कुडाळकर पुढे म्हणाले.
आंबेडकरांना जाती धर्माच्या चौकटीत बंदिस्त करू नका ; कृष्णा पालयेकर
नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीचा हार आणि धर्माची चौकट घालून लोकांनी आपापसात वाटून घेतलेला आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य भारतीयांच्या होते त्यांनी जे कार्य केलं हे सर्वसामान्य भारतीयांच्या उद्धारासाठी कार्य केलेला आहे. ते न विसरण्यासारखे आहे, अशा या महान महापुरुषाला जातीच्या आणि धर्माच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांचे विचार विशालतेने आत्मसात केले पाहिजे.
विज्ञानाची कास धरा ः भारत बागकर
वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून विज्ञानाची कास करा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य या देशासाठी केलेले आहे.आपण आज विविध स्तरावर जगत असताना त्यांच्या विचारांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचार करून कार्य केले पाहिजे, असे यावेळी भारत बागकर म्हणाले की,
यावेळी दहावीच्या 2021 च्याअ परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या इब्रामपूर गावातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. श्री सातेरी विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक सुभाष सावंत, माजी शिक्षक नागेश फाटक, लॉरेन्स डीसोझा, शिक्षिका वंदना कळंगुटकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तसेच रोपटय़ाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागत व प्रास्ताविक अनिल इब्रामपूरकर यांनी केले. प्रज्ञा परवार, विशाखा परवार, संदीप परवार यांनी पंचशील व पुष्गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. परेश परवार यांनी सूत्रसंचालन केले सदा परवार तर साईनाथ इब्रामपूरकर यांनी आभार मानले.