प्रतिभावंत कलाकार ओम राऊत यांचे ‘भारताचे पुनर्जागरण’वर व्याख्यान : म्हापशात सार्वजनिक गुढी पाडव्याला हजारो संख्येने उपस्थिती
म्हापसा : 14 व्या शतकात रेनीसान्स ही परंपरा युरोपमध्ये जन्माला आली. रेनीसान्स म्हणजे पुनर्जन्म म्हणजेच पुनर्जागरण. आम्ही ऊढी आणि परंपरा यात फारसे न जाता आपली असलेली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेऊन संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृती कशी वाढविता येईल याचा विचार करायला पाहिजे. तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने या पुनर्जागरणचा भाग बनू शकतो, असे प्रतिपादन तानाजी या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारांचे सर्जनशील आणि प्रतिभावंत कलाकार मा. ओम राऊत (मुंबई) यांनी केले.
म्हापसा टॅक्सी स्थानकावर म्हापसा नववर्ष स्वागत समिती आयोजित सार्वजनिक गुढी उभारणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्सव समितीचे अध्यक्ष अमेय नाटेकर, उपाध्यक्ष प्राची साळगावकर, सायली परब, कार्यवाह विनय वालावलकर, खजिनदार श्रेयश कवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सार्वजनिक गुढी उभारली. पहाटे खोर्ली येथील श्री देवी सातेरी चरणी श्रीफळ देऊन गाऱ्हाणे व माऊती देवाला नमन करून पारंपरिक वेषात भगवे घेऊन व ढोलपथकाच्या आवाजात शोभायात्रेला सुऊवात झाली. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच नगरसेवक या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.
14 व्या शतकात रेनीसान्स परंपरेचा जन्म
आपल्यास भारताचे पुनर्जागरण हा विषय बोलायला दिला आहे. आता यावर काय बोलायचे. पहाटे उठून गुढी पाडव्यादिवशी शहरात अतिप्रसन्न वातावरणात शोभायात्रा काढायच्या व येथे भव्य दिव्य सार्वजनिक गुढी हजारो संख्येच्या उपस्थितीत काढायची म्हटल्यावर हेच देशाचे पुनर्जागरण आहे. पुनर्जागरण याचा अर्थ रेनीसान्स असा म्हटला जातो. रेनीसान्सची फ्रेंच शब्दातून उत्पत्ती होते. याचा अर्थ रिबथ म्हणजे पुनर्जन्म. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये त्याला पुनर्जागरण असे म्हणतो. याची उत्पत्ती का झाली तर 14 व्या शतकात रेनीसान्स ही परंपरा युरोपमध्ये जन्माला आली. तेथील इटालीयन कलाकार होते त्या लोकांना ग्रीस आणि रोमन यंचा कल्चर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने करायला प्रारंभ केला, असेही ओम राऊत यांनी सांगितले.
….तर खऱ्या अर्थाने पुनर्जागरणाचा भाग बनू
ओम राऊत म्हणाले की, भारत आज अशा खूप महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आज भारताकडे सक्षम तऊण शक्ती आहे. आज ज्या प्रकारे देशात नवीन तंत्रज्ञानाचा नवीन विषयांचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जर आज आपण आपली कला, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही पुढच्या पिढीसाठी नेऊ शकलो तर आपण खऱ्या अर्थाने या पुनर्जागरणाचा भाग होऊ, असे आपल्यास वाटते, असे त्यांनी सांगितले.
संस्कृतीचा विकास नक्कीच करायला पाहिजे
ऊढी आणि परंपरा आहेच त्यात फारसे जाऊ नये. आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतिचा विकास नक्कीच करायला पाहिजे. आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पुढच्या पुढच्या पिढीपर्यत कशी नेता येईल तर संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृती कशी वाढविता येईल याचा आम्ही विचार करायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
म्हापसा नववर्ष स्वागत समितीचे अभिनंदन!
भाषेचा कुठल्याही प्रकारचा अपमान करू नये असे म्हणतात आणि तो बोलताना झाल्यास अत्यंत वाईट आहे आणि तो अपमान आपल्यास मान्य नाही. आपली संस्कृती अत्यंत चांगली आहे. सकाळी पहाटे उठून घोषणा देत म्हापसा शहरात सर्वत्र शोभआ यात्रा निघतात याच मन अत्यंत प्रसन्न होते. शिवाय म्हापसा नववर्ष स्वागत समितीने सुमारे 20 वर्षे ही परंपरा टिकवून ठेवली आहे. अशी माहिती यावेळी प्रमुख वक्ते ओम राऊत यांनी दिली. सलग 20 वर्षे गुढीपाडव्याचे आयोजन केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.