24 तासांत पावसाने 1 घर जमीनदोस्त तर 317 घरांची पडझड : पुढील 5 दिवस दमदार पावसाचा अंदाज
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी दिवसभर संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. या पावसामुळे शहरासह उपनगरांमधील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले होते. पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे यावषीही पूर येणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री 8.30 पासून सोमवारी सकाळी 8.30 पर्यंत 7.9 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळला. पावसामुळे बळ्ळारी नाला परिसराला पूर आला आहे. याचबरोबर शहर व उपनगरांमधील अनेक घरांच्या उंबऱयापर्यंत पाणी पोहोचले होते. पाऊस असाच पडत राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोमवारी संततधारेमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बाजारपेठेतील व्यापारी तसेच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. पावसामुळे गेल्या 24 तासांत जिल्हय़ामधील अनेक घरांची पडझड झाली आहे.
मार्कंडेय नदीही दुथडी भरून वाहत आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर जुने पूल पाण्याखाली जाणार आहेत. या पावसामुळे शिवारामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकरी भात लावणीच्या कामाला लागला आहे. मात्र अधिक पाऊस झाला तर काही पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गांधीनगरजवळ नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी साचून होते. याचबरोबर शहरातील बसवेश्वर सर्कल, टिळकवाडी, आरपीडी क्रॉस व इतर ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. काही ठिकाणी गटारीत कचरा अडकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत होते. त्यामधून वाहनचालक व पादचाऱयांना ये-जा करणे कसरतीचे ठरत होते.
बळ्ळारी नाल्याला पुराचा विळखा
बळ्ळारी नाला हा शेतकऱयांसाठी दरवषीच शाप ठरू लागला आहे. आता बळ्ळारी नाला परिसरातील शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी तुडुंब भरले आहे. त्यामुळे भात पाण्याखाली गेले असून कुजण्याची शक्यता आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी अनेकवेळा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा फटका शेकडो एकर जमिनीला बसला आहे.
येळ्ळूर रस्त्यापासून हा पूर आला असून आता शेतकऱयांना पुन्हा भात लावणी करावी लागणार आहे. बळ्ळारी नाल्याला लागूनच हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. शेतकऱयांनी विरोध करूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. न्यायालयाने स्थगिती दिली होती. तरीदेखील काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळेदेखील शेकडो एकर जमिनीला फटका बसला आहे. या अंदाधुंद कारभारामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.