ऑनलाईन टीम / तरुण भारत :
The killers of Rajiv Gandhi will be released माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या सुटकेचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. जवळपास 30 वर्षांपासून हे आरोपी तुरुंगात आहेत. या आरोपींवर अन्य कोणते गुन्हे नसतील, तर त्यांची सुटका करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरण, पी रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या आरोपींची वागणूक समाधानकारक असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करावी असे निर्देश दिले आहेत.
अधिक वाचा : बेलापुरात होणार MPSC चे नवे कार्यालय, 282 कोटींच्या खर्चास मान्यता
पेरारिवलनची यापूर्वीच सुटका
या प्रकरणातील आरोपी पेरारिवलनची यापूर्वीच सुटका करण्यात आली आहे. 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन यांच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून हा आदेश दिला होता.