16-10-2022 ते 22.10.22 पर्यंत
मेष
सध्याचा काळ हा योजना बनवण्यात आणि कृतीच्या नावाने स्वस्थ बसण्यामध्ये जात आहे. या परिस्थितीला बदलायचे असेल तर योजनांना आणि कल्पनांना कृतीमध्ये उतरवावे लागेल. मनाचा कमकुवतपणावरती मात करून आणि जेव्हा लागेल तेव्हा इतरांची मदत घेऊन कामे फत्ते करा. काही संधी मिळतील. ओळखीतून फायदा होईल. आर्थिक यश मिळेल.
वैवाहिक जोडीदाराला हिरव्या रंगाचे वस्त्र भेट द्यावे.
वृषभ
आठवडय़ामध्ये तुम्ही गोड बोलून दुसऱयांकडून कामे करून घ्यावी जिथे गुळाने काम होते तिथं गोळीचे काम नाही हे तुमचे ब्रीदवाक्य असेल. कित्येक लोकांना तुमच्या सल्ल्याचा फायदा होईल. तुम्ही आखलेल्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये मधुरता येईल. पैशाच्या बाबतीत आठवडा उत्तम आहे .एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्मयता असेल.
हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा.
मिथुन
बऱयाच जबाबदाऱयांचा सामना करावा लागेल. काही गोष्टींबद्दल तुमचे मन तयार नसेल. काही अनावश्यक जबाबदाऱया डोक्मयावर पडल्याची जाणीव तुम्हाला होईल. संयम ,नियोजन आणि सारासार विचार या गोष्टींची काळजी घेतली तर कुठलेही ध्येय अप्राप्य असणार नाही. आत्मविश्वासाच्या आणि ध्येयपूर्तीच्या नादात भावनिक संबंधांमध्ये मात्र दुर्लक्ष होऊ शकते.
काजळाची डबी जवळ ठेवावी.
कर्क
तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती गुंतलेल्या आहेत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात उज्ज्वल यश मिळवण्याकरता काही काळ वाट बघावीच लागते. स्वतःतील आणि मित्रांमधील कौशल्याचा योग्य वापर करावा. ग़ाफील राहू नये. उत्साह कमी होऊ देऊ नये.
पक्ष्यांकरता पाण्याची सोय करावी.
सिंह
कष्टाचे प्रमाण जास्त आणि पैशांची आवक त्यामानाने कमी असल्यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन पद्धतीचे काम शोधण्याच्या प्रयत्नात असाल. या गोष्टी करता मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक ताळमेळ न बसल्यामुळे खर्चावर नियंत्रण असणार नाही. या आठवडय़ात कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका.
वारुळाची माती जवळ ठेवावी.
कन्या
हा आठवडा थोडा उदासवाणा किंवा रेंगाळलेला असा वाटू शकतो. कामाची गती कमी झाल्यामुळे उत्साहात कमी येऊ शकते. दररोजच्या सवयीच्या तेच तेच जगण्याला तुम्ही थोडे कंटाळून जाल. या आठवडय़ात तुम्ही नवीन संधीच्या शोधात असाल. उत्साहवर्धक काही करावेसे वाटेल. थोडक्यात तुम्हाला जीवनशैलीमध्ये बदल करावासा वाटेल.
निळा रंगाचा हातरुमाल जवळ बाळगावा.
तूळ
या आठवडय़ात विचारातील गोंधळ आणि निर्णय करण्याच्या क्षमतेतील वैगुण्य यामुळे समोरील पर्यायांपैकी कशाची निवड करावी याचा बोध तुम्हाला होणार नाही. मानसिकता थोडी चलबिचल असू शकते. हा मानसिक गोंधळ वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या बाबतीतही लागू पडतो. त्यामुळे डोळसपणे निर्णय घेणे योग्य ठरेल. आंधळा विश्वास करू नका.
मोकाट जनावरांसाठी खाण्यापिण्याची सोय करा.
वृश्चिक
कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी आणि घरातील अडचणी सोडवण्यामध्ये दमछाक होऊ शकते. वेळ कमी पडल्यामुळे काही कामे अर्धवट राहू शकतात. या आठवडय़ात एकापेक्षा जास्त बाजूनी तुमच्यावर ताण येऊ शकतो. अशावेळी मन स्थिर ठेवून काम करणे हितावह ठरेल. परिवारातील सदस्यांची साथ मिळू शकते. सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घाला.
धनु
पैशांच्या बाबतीमध्ये व्यवहारीपणा येईल. काही वेळा भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय घेणे जास्त संयुक्तिक ठरेल. घरातील वडीलधाऱया व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. या आठवडय़ात अध्यात्माशी संबंधित व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. एकंदर हा आठवडा आर्थिक आणि भावनिक दृष्टय़ा चांगला आहे.
मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला एखादी जीवनोपयोगी वस्तू भेट द्यावी.
मकर
सावधगिरीने पावले उचलण्याची गरज आहे. कोणावरही अतिविश्वास किंवा अंधविश्वास ठेवून चालणार नाही. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. आर्थिकदृष्टय़ा आठवडा सर्वसामान्य राहिल. नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ नयेत याकरता प्रयत्न करावे लागतील. प्रेमींना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण टिकवून ठेवण्याची गरज आहे.
तेलाचे दान करावे.
कुंभ
भावनाप्रधान होऊन चालणार नाही. जे प्रॅक्टिकल डिसिजन्स आहेत ते योग्य तो तर्क वापरूनच घ्यावेत. घरातील कोणत्याही निर्णयांमध्ये बाहेरच्या व्यक्तीला सामील करून घेऊ नका. एखादा लांबचा नातेवाईक किंवा मित्र पैशाची मागणी करू शकतो. यात धोका नसला तरी चादर पाहून पाय पसरलेले बरे. अनाठायी खर्चाला आळा घालणे आवश्यक आहे. तब्येतीला सोसवेल असेच खानपान असावे.
गरजूला आर्थिक मदत करावी.
मीन
समजा एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल किंवा एखादे उत्तर अपेक्षित असेल तर तुम्हाला फार काळ वाट बघावी लागणार नाही. लवकरच काम पूर्ण होईल. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून लवकरच होकार मिळवू शकाल. लहान मोठे यश पदरी पडेल. एकूणच सकारात्मक बदल दाखवणारा आठवडा आहे.
जलाशयाजवळची माती घरी ठेवावी.
टॅरो उपाय ः कोणत्याही प्रकारच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नदीतले 5 खडे घेऊन ते तांब्याच्या ताम्हणात ठेवावे. जलदेवता समजून त्यांची पूजा करावी. पांढरी फुले अर्पावी. रात्री परत त्याच नदीत ते खडे सोडून यावे.