कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विदा सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र विकास आघाडीत (MVA) तणाव निर्माण झाला होता. राहूल गाधी यांना इशारा देताना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी इथून पुढे सावरकरांवर होणारी टिका खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले होते. या तणावादरम्यान, नवी दिल्लीत झालेल्या कॉंग्रेस पुरुस्कृत विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये समझोता करून भाजपला विरोध तिव्र करण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान केले आहे.
मोदी आडनावावरून टिका केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांना आपल्या सदस्यत्वाच्या अपात्रतेला सामोरे जावे लागले. भाजपने राहूल गांधी यांनी मोदी समुदायाची माफी मागावी अशी मागणी उचलून धरली. त्यावर राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन “मी सावरकर नाही…मी गांधी आहे…मी माफी मागणार नाही” अशी भुमिका घेतली. राहूल गांधींच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांना सावरकर हे आपले दैवत असून त्यांच्यावर केलेली टिका खपवून घेतली जाणार नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीत झालेल्या या गोंधळानंतर नवी दिल्लीत झालेल्या कॉंग्रेस पुरस्कृत विरोधकांच्या बैठकिमद्धे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिष्टाई केली आहे. भाजप विरोधाची दार तिव्र करायची असेल तर आपल्याला एकत्र येऊनच लढलं पाहीजे. तसेच सावरकर या मुद्द्यावर कोणतीही टिका टिप्पणी करू नये. सावरकरांवरिल टिकेमुळे महाविकास आघाडीला कोणताही फायदा नसल्याचेही त्यांनी कॉंग्रेस आणि शिवसेनेला समजावले.