तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) ऱाष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या पक्षविस्ताराची सुरवात करण्यासाठी प्रथम त्यांनी महाराष्ट्र हे राज्य निवडले असून त्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. राज्यातील अनेक नेते व संघटनांचे समर्थन मिळवण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मोठा मेळावा आयोजित केला असून या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे (Swaraj Sanghatana) प्रमुख संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी काल, दि. २६ जानेवारी रोजी केसीआर यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री केसीआर यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी घडून आली. या भटीमध्ये केसीआर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर स्नेहभोजनानंतर तब्बल पाच तास चर्चा केली.
हेही वाचा >>>> प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरायला हवेत- संजय राऊत
महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे नवा राजकीय पर्याय उभा करत असतानाच केसीआर हेदेखील महाराष्ट्राच्या राजकराणात उतरू पाहत आहेत. महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे पाय रोवण्यासाठी त्यांना राज्यातील सर्वपरिचित, प्रभावी व स्वच्छ चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहत आहेत. तसेच केसीआर यांचा पक्ष छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेशी युती करून देखील राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकरता येत नाही. या नविन राजकिय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे जुळवले जाण्याची शकता नाकारता येत नाही.