बंदर कप्तानमंत्री सुभाष फळदेसाई यांची मालीम जेटीला भेट : जेटीवरील सर्व समस्या महिन्यात सोडविण्याचा अधिकाऱयांना आदेश
प्रतिनिधी /म्हापसा
येत्या महिन्याभराच्या कालावधीत मालीम जेटीवर सतावणाऱया सर्व समस्या सोडवा. दुपारच्यावेळी फेरीबोटीतून ये-जा करणाऱयांना बाहेर उन्हात रहावे लागते. खात्याच्या अधिकाऱयांना गेली 10 वर्षे सांगूनही येथे शेड उभारली जात नाही. शौचालय नसल्याने जनतेचे हाल होतात. अधिकारीवर्ग सांगूनही लक्ष घालीत नाही. पायलटांच्या समस्या आहेत त्याकडे लक्ष दिले जात नाही. अशा आशयाचा विविध समस्यांचा पाढाच आमदार केदार नाईक यांनी बंदर मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासमोर वाचताच मंत्री बरेच संतप्त झाले.
सर्व समस्या महिन्याभरात सोडवा, आपण दुसऱया महिन्यात याठिकाणी येऊन पाहणी करून पुन्हा आढावा घेणार असल्याचा स्पष्ट आदेश मंत्री फळदेसाई यांनी कप्तान बंदर खात्याच्या अधिकारीवर्गांब्प् दिला आहे.
कामे अडून राहतात ही लाजीरवाणी गोष्ट
यावेळी आमदार केदार नाईक, पंच सदस्य, टॅक्सी तसेच मोटार सायकल चालक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपापल्या समस्यांचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला. याठिकाणी अद्याप प्रवाशासाठी शेड उभी राहत नाही ही खेदजनक असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. भाजप सरकारात असे होत असल्यास यास अधिकारीवर्ग जबाबदार असल्याचे सांगून काही अधिकाऱयांवर कारवाईचे संकेतही मंत्र्यांनी बोलून दाखविले. एक आमदारच जेव्हा अधिकाऱयांची तक्रार मंत्र्याकडे करतात ही गोष्ट लाजीरवाणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणी समस्या, शौचालय समस्या, शेड उभारण्यास काय समस्या आहे हे काम होत नाही असा थेट प्रश्न करून गेल्या पाच दहा वर्षे हे काम का होत नाही. होत नाही तर आपल्यास सांगा असे म्हणून मंत्र्यांनी उपस्थित अधिकारी वर्गांना बरेच खडसावले.
सर्व समस्या सोडविण्याचा आदेश
पत्रकारांशी बोलताना मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, याठिकाणी फेरीबोट ये-जा करताना उशीर लागतो त्यामुळे याठिकाणी अन्य एक फेरीबोट मागविण्यात येईल. येथे शेड उभारण्याचा प्रश्न आहे तो महिन्याभरात सोडवू तसेच शौचालय मुताऱया नाहीत त्याचीही व्यवस्था करण्यात येईल. येथे पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण या सर्व गोष्टींचा दोन महिन्यात पाठपुरवठा करणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले. व गेल्या आठ वर्षापासून ज्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या त्या सोडविल्या जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार केदार नाईक यांनी मंत्र्याचे आभार मानले व ज्या समस्या आहे त्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले. येथील फेरीबोट अन्यत्र हलवू नये असा स्पष्ट आदेश मंत्र्यांनी दिला आहे. शेड, शौचालय, जेटी दुरुस्ती आदी सर्व प्रश्न प्रामुख्याने मंत्री सोडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामचुकार अधिकाऱयांनो घरी जाण्यास सज्ज रहा
दरम्यान मंत्री सुभाष फळदेसाई अधिकारी वर्गांना उद्देशून म्हणाले, आपल्यास असेच समजू नका. आपण खासगी गाडीमधून येऊन सर्व पाहणी केलेली आहे. येथे अधिकारी वर्ग आपल्या डय़ुटीवर नसतात हेही पाहिले आहे. एक दोनच अधिकारी कार्यालयात पहायला मिळतात. येथे विकासाच्याबाबत समस्या आमदारांना आपल्यास सांगावे लागते ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. कामचुकारानो सावध रहा. गाठ आपल्याशी आहे. कामचुकारपणा केल्यास घरी जाण्यास सज्ज रहा अशी स्पष्ट ताकीद मंत्री फळदेसाई यांनी अधिकारी वर्गांना दिली.