महापालिकेवरच गैरविश्वास : कोट्यवधींच्या कामांचे पितळ उघडे पाडले
सांगली : मिरज आमदार सुरेश खाडे यांच्या मिरज मतदार संघातील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या केवळ वल्गना आहेत. केवळ रिमझिम पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली. आणि आमदारांचे विकासाचे पितळ उघडे पडले. हजारो कोटी रुपयांचा निधी मिरजेत कुठे मुरला? याची चौकशी लावणार असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा दावा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य बाळासाहेब होनमोरे पत्रकार बैठकीत केली.
आमदारांनी आत्तापर्यंत मतदार संघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा केला आहे. सतत कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे ते सांगतात. पण, मतदार संघ मात्र आजही मकासच आहे. त्यामुळे हा निधी कोठे मुरतो? याची चौकशी करण्याची मागणी होनमोरे यांनी केली. मिरज शहराची अवस्था तर अतिशय दयनीय झाली आहे. किरकोळ पावसाने सर्वत्र दलदल, घाणीचे साम्राज्य आणि रस्त्यावरील मोठ्या खड्यांमुळे मिरजकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. लहान शाळकरी मुलांना खड्डे मुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांसाठी लाजिरवाणी बाब आहे.
हे ही वाचा : बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय आधीच झाला होता, विनायक राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
तर अतिशय दयनीय झाली आहे. किरकोळ पावसाने सर्वत्र दलदल, घाणीचे साम्राज्य आणि रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे मिरजकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. लहान शाळकरी मुलांना हातात आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याची कामे दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. याचा अर्थ आमदारांचा मनपावर वचक राहिला नाही. भाजपाचेच नगरसेवक त्यांचे ऐकत नाहीत, हे स्पष्ट होते. पण, मनपावर ठपका ठेवून आमदारांना हातवर करता येणार नाहीत. आता जनतेतून उठाव होऊ लागल्याने प्रत्येकाच्या प्रश्नांना त्यांना उत्तरे द्यावी लागतील, असेही होनमोरे म्हणाले.
आमदार खाडेंना सतत खोटे बोलण्याची सवय लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपयांच्या कामाचा माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार होता. तो निधी कोठून आला? असा प्रश्न उपस्थित करताना राज्य शासनाकडून एक रुपयांचाही निधी मिळाला नसल्याचे ते खोटे सांगतात. अल्पावधीत मिरजेत आलेला निधी आकडेवारीसह जाहीर करु.. राज्य शासनाकडून सुडको, नाबार्ड, सामाजिक न्याय, ग्रामीण रस्ते विकास, इतर ग्रामीण मार्ग, अंदाज पत्रिका रक्कम अशातून कोट्यवधींचा निधी मिळतो. हा निधी शासनाचा नाही काय? असा प्रश्न यावेळी होनमोरे यांनी उपस्थित केला.
मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा निधी आला. पण, मनपा पदाधिकाऱ्यांवर आमदारांचे नियंत्रण नसल्याने दर्जाहीन कामे झाली. असाच याच्यातून अर्थ निघतो. त्यामुळे हा निधी कोठे मुरला? याची चौकशी लावणार. ग्रामीण भागात तर एका कामाचे सहावेळा उद्घाटन करण्यात आले, असा आरोपही होनमोरे यांनी या बैठकीत केला.