प्रतिनिधी / म्हापसा
भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुकीपूरतीच कामे न करता प्रत्येक मतदारांच्या घरोघरी पोचण्यासाठी भाजप पक्षाने प्रारंभ केला आहे. एक देश अखंड भारत म्हणते तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशासाठी काय केले हे आम्ही या प्रदर्शनातून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा कार्यक्रमात त्यांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री खंवटे बोलत होते. हे प्रदर्शन 24 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, जिल्हा सदस्य मनिषा नाईक, दिक्षा कांदोळकर, रुपेश कामत आदी उपस्थित होते.
मोदींमुळे देशाचा मान वाढला
तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनात आम्ही कसे पुढे पोचणार, युवा पिढी शैक्षणिक माध्यमातून कसे पुढे जाणार याकडे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनी लक्ष केंद्रीत केले आहे. खेलो इंडिया माध्यमाद्वारे आम्हाला मॅडल्स प्राप्त झाली आहेत. यापुढे जाऊन आम्हाला खूप काही मिळवायचे आहे. जगातील देश भारताकडे मोठय़ा अभिमानाने पाहत आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीमुळे शक्य झाले आहे, असेही खंवटे म्हणाले.
2025 पर्यंत देश टिबी मुक्त करण्यासाठी पुढाकार– सदानंद तानावडे
नरेंद्रजी मोदी यांचे बालपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंत सर्व प्रदर्शन आज आम्हाला पहायला मिळत आहे. त्यावेळी छोटे चहाचे शॉप चालवित होते. देशाच्या आर्मींना ते चहा देत होते. असे मोगीजी आज आमच्या देशाचे पंतप्रधान झाले. असे मोदीजी आपल्या 20 वर्षाच्या कालावधीत आपल्यास एकही डाग न लावता देशासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांना एखादे गीफ्ट मिळाले की ते वर्षात ते लिलाव करून देशासाठी समर्पिक करतात असे मोदी आहेत. 2025 पर्यंत देशात कुणालाही टिबी होऊ नये यासाठी मोदींनी पुढाकार घेतला आहे. अंगणवाडय़ाही दत्तक घेतल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.