अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निष्क्रिय संस्थांची ओळख करुन घेण्यासाठी एक विशेष अभियान सरकारकडून सुरु करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत वर्ष 2021 ते 22 पर्यंत 4,32,796 कंपन्यांची नावे नोंदणीकृत सुचीमधून हटविली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना राज्यसभेत दिली आहे.
कंपनी कायद्यांतर्गत कलम 248 च्या अंतर्गत निष्क्रिय कंपन्यांची ओळख करण्यासोबत कंपन्यांची नावे नोंदणीकृत सुचीमधून काढून टाकली आहेत. यामध्ये वर्ष 2021-22 च्या दरम्यान एकूण 49,921 निष्क्रिय कंपन्या सापडल्या आहेत. ज्यांची नावे अखेर सरकारकडून काढून टाकण्यात आली आहेत.
आणखीन एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सितारामन यांनी सांगितले की, कंपनी कायदा 164 (2) च्या अंतर्गत 5,68,755 संचालकांना अघोषित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
यासह विविध बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरकारने त्या 68 कंपन्यांच्या वास्तविक स्वामित्वाचा शोध करण्याचा आदेश दिला होता. ज्यामध्ये बँक खात्यांमध्ये 25 कोटीपेक्षा अधिकची रक्कम जमा केली होती. तसेच नोटबंदीच्या घोषणेनंतर रक्कम काढण्यात आली होती. .