प्रतिनिधी/ मेढा
येत्या विधानसभेला आमदार आपल्याच राष्ट्रवादी पार्टीचा पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे .आपला पक्ष कोणाच्याही दावणीला बांधण्याची गरज नाही. कोण कुठे गेला हे आता पाहात बसण्याची वेळ नसून ,नवीन माणसे तयार करा. प्रत्येक गावागावात राष्ट्रवादीची शाखा व घराघरात कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे .त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे .निष्ठेने काम केले तर त्याचे फळ निश्चितच मिळते .असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी केले.
मेढा येथील एस एस पार्टे मंगल कार्यालया मध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन ना.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले होते. त्याप्रसंगी ना. पाटील बोलत होते .ते पुढे म्हणाले आमदार कुठलाही असो राज्यात सरकार आपले आहे. त्यामुळे काही काम असले तर निसंकोचपणे मला थेट भेटा .आता मागे घ्यायचे नाही असे सूचित केले.
कार्यक्रमास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील खा. श्रीनिवास पाटील ,आ. शशिकांत शिंदे , प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख ,युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे ,प्रदेशाध्यक्ष युवती सक्सेना सलगर, प्रदेशाध्यक्ष युवक विद्यार्थी सुनील गव्हाणे ,आयटी सेल चे प्रांतिक अध्यक्ष सारंग बाबा पाटील ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला समिंद्रा जाधव, युवा जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे , त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस गोरख नलावडे ,युवती जिल्हाध्यक्ष पुजा काळे, सभापती जयश्रीताई गिरी, राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रूपाली भिसे माजी सभापती बापूराव पार्टे, मोहनराव शिंदे , सुहासदादा गिरी ,आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना .बाळासाहेब पाटील ,खा.श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणांमधून पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व घराघरात राष्ट्रवादीचे विचार पोहोचवून पवार साहेबांचे हात बळकट करावेत असे सूचित केले.
याप्रसंगी आ. शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले सातारा जावली विधानसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा करून.. ग्रामपंचायत ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका तेवढय़ाच ताकतीने लढवल्या जातील व जिह्यात पुन्हा राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू असे सूचित केले. बोंडारवाडी बरोबरच महू हातगेघर ,धरणाचा व धरणग्रस्तांचे प्रश्नाबाबत आमदार शिंदे यांनी ऊहापोह केला. तर दीपक पवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा सांगताना पक्षाचे अनेक पदाधिकारी अन्य पक्षात गेले मात्र अशा लोकांच्या वर पक्षाने काहीच कारवाई केली नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.