प्रतिनिधी / बेळगाव
जन्म -मृत्यू ची नोंद करणे बंधनकारक आहे. आहे याबाबतची नोंद करून महापालिकेकडून दाखले देण्यात येत होते. पण सेवा केंद्रांवर दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने महापालिकेतुन दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहे. परिणामी महापालिका कार्यालयात दाखले देणाऱ्या एजंटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
महापालिकेच्या दप्तरात जन्म- मृत्यूची नोंद झाल्यानंतर जन्म व मृत्यूचा दाखला दिला जात होता. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळत होती. दाखले मिळविण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत होती. दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दाखले मिळवणे सोयीचे व्हावे या उद्देशाने संगणकीकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून जन्म मृत्यु दाखले सेवा केंद्रावर दाखले उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात आली आहे. सेवा केंद्रावर दाखले देण्यात येत असल्याने महापालिका कार्यालयातील दाखले देण्याचे काऊंटर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.पण नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन एजंट दिशाभूल करीत आहेत. जन्म- मृत्यू आपल्यासाठी अर्ज भरून देण्याकरिता एकच व्यक्ती प्रवेशद्वाराजवळ थांबून असायचा. पण आता या ठिकाणी चार ते पाच व्यक्ती अर्ज भरून देण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट करत आहेत. मनपा आवारात एजंटांचा वावर वाढण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. येथील एजंटगिरी बंद करण्यासाठी महापालिकेकडून किमान एक दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करणे आहे. वास्तविक पाहता महापालिकेकडून वर्षानुवर्षे दाखले दिले जातात. सध्या यामुळे मनपात दाखल्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दाखले देऊन पुढील सेवा केंद्रावर दाखले घेण्याची सूचना करावी अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
Previous Articleभक्तांसाठी खूशखबर! गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात
Next Article कासेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दोघे सराईत तडीपार