मंगळवेढा २४ गाव सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर स्मारक, संत चोखामेळा यांचे स्मारक कामे मार्गी लावण्याचे आश्वासन
मारोळी प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील अनेक वर्षापासून चर्चेत असणारा मंगळवेढा 24 गाव सिंचन योजनेला गती देऊन सर्व मान्यता घेतल्या असून नवीन दर सूची प्रमाणे कॅबिनेटमध्ये मान्यता देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुर ता.मंगळवेढा येथे आवताडे शुगर अॅन्ड डिस्टलरीज प्रा.लि. नंदूरच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना आश्वासित केले.
तालुक्यात चेअरमन संजय आवताडे व आ. समाधान आवताडे यांच्या अथक परिश्रमाने आवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रा लि ची सुरुवात झाली. यावेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. कार्यक्रमाचे स्वागत पर प्रास्ताविक तालुक्याचे आ.समाधान आवताडे यांनी केले प्रास्ताविकामध्ये आ. समाधान आवताडे यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले.तसेच सभागृहामध्ये नवखा आमदार असूनही प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहित केले याचा उल्लेखही आ. समाधान आवताडे यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे ऊस कारखानदारी जिवंत राहिली त्यानंतर सातत्याने एफ आर पी वाढवण्यात आली. एफ आर पी देण्यासाठी सक्षम करण्यासाठीची मिनिमम सेलिंग प्राईज चा अध्यादेश काढला. कारखानदाराने उपपदार्थावर भर दिला पाहिजे. कारण इथेनॉलच्या माध्यमातून चार पैसे मिळाल्याने वेळेत एफ आर पी शक्य होते. मोदींना साखर कारखान्यातील काय कळते म्हणणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या सर्व निर्णयाचे स्वागत करत आहेत.त्याचबरोबर सरकार आल्यानंतर सततच्या पावसाने नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळेल, 65 मिलिमीटर अट नट ठेवता मदत सुरू केली आहे. मागील सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. हे सांगताना फडणवीस म्हणाले लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय काही खरं नसतं असं म्हणून विरोधकांना त्यानी टोला लगावला. आ.समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना स्पर्श केल्याने प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला जाईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी आ. आवताडे यांनी झोकून दिले त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी पाठबळ देत आले आहेत.
केंद्र सरकारमुळे साखर कारखानदारी टिकून आहे मी शेतकऱ्यांचा नेता असे सांगून शेतकरी मागे फिरत राहिला पाहिजे या भूमिकेतून खेळवत ठेवले. दिल्लीत शिष्ट मंडळ न्यायचे आणि रिकामे हाती परत आणायचे, वीस वर्षे साखर कारखानदारी सांभाळलेली त्यांनी ती विकायला निघाली असेही यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
प्रसंगी खा.जयसिद्धेश्वर महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.राम शिंदे, आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी आ.प्रशांत परिचारक, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. शहाजी पाटील, आ. सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह संजय आवताडे, सचिन जाधव, शशिकांत चव्हाण, विष्णुपंत अवताडे, सोमनाथ अवताडे, विनायक यादव, कार्यकारी संचालक मोहन पिसे, ज्ञानेश्वर बळवंतराव, अंबादास कुलकर्णी, प्रदीप खांडेकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते