मंत्री रोहन खंवटे : नागरिकांच्या तक्रारी तात्काळ तडीस लावण्याची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / म्हापसा
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन उपजिल्हाधिकारी, मामलेतदार, गटविकास अधिकाऱयांसह विविध खात्याच्या अधिकारी वर्ग यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पर्वरी, साळगाव व हळदोणेतील काही नागरिकांना त्यांच्या समस्या घेऊन बोलावण्यात आले होते. बार्देश मामलेदार तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱया नागरिकांना तारीख पे तारीख न देता त्यांचे प्रश्न त्वरित तडीस लावावे, असा आदेश मंत्री रोहन खंवटे यांनी अधिकाऱयांना दिला.
नागरिक पुन्हा पुन्हा सरकारी कार्यालयात येऊन हेलपाटे मारत असल्यास लोकप्रतिनिधीचे काम असते की यामागचे कारण काय आहे, त्याचा शोध लावून विचारपूस करण्याचा. यात काही वयोवृद्ध नागरिक येत असतात. कधी या तक्रारी आमच्यापर्यंत येतात मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी आज आम्ही संयुक्त बैठक बोलावली होती व पर्वरी व काही हळदोणातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती यावेळी खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समस्या तात्काळ कशा सोडविता येईल याकडे लक्ष
पर्वरीतील 3 पंचायतीतील महसूलांसंबंधी केसेस बाकी राहिल्या आहेत त्याची माहिती उपजिल्हाधिकाऱयांशी बोलून समजून घेतली आहे व त्यावर चर्चाही झाली आहे. महसूल मंत्र्याशी बोलून या कसेस तात्काळ कशा सोडविता येईल याकडे आपण लक्ष ठेवले असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली. मुख्यमंत्र्याशी बेलणी झाल्यावर तालुका पातळीवर संबंधित मंत्र्याला बरोबर घेऊन काही समस्यांवर तोडगा काढता येतो अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.
अधिकारी वर्गानीही लक्ष देणे आवश्यक
अधिकाऱयांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. काही अधिकारी खरोखरच चांगले आहे. समस्यावर तोडगा त्वरित काढणे गरजेचे आहे. त्यावर तारीख पे तारीख नको असे मंत्री खंवटे म्हणाले. जे विषय कुठे कमी पडले ते महसूल मंत्र्याशी बोलून सोडवू असे ते म्हणाले.
पैसे भरूनही काही घरे कायदेशीर झाली नाहीत
मामलेतदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयातील समस्या ज्या थेट कायद्यातज्ञाकडे येतात ज्या तक्रारी नागरिकांच्या होत्या त्यात काही लोक अडकून पडलेले आहेत. तेच लोक आजवर येथे आपल्या समस्या सोडविण्यासाठी हेलपाटे मारीत असतात यापूर्वीही कायद्यामुळे काही तक्रारी अडकून पडल्या होत्या त्यासाठी लोक येथे आले होते असे मंत्री म्हणाले. स्वतःच्या जागेत स्वतः बांधकाम करताना उद्भवलेल्या कायद्याच्या समस्या, काही घरे पूर्वीपासून बांधलेली आहेत मात्र ती कायम केली नाहीत. आम्ही कायदा काढला होता. काही ठिकाणी इन्स्पेकशन झाले मात्र त्याचे अद्याप पैशाचे व्यवहार झालेले नाही. शिवाय ते घर कायमस्वरूपी होत नाही. ते प्रश्न पुन्हा पुन्हा नको म्हणून महसूल मंत्र्याशी बोलून हे प्रश्न सोडवू असे मंत्री म्हणाले.
महसूल भवन उभारण्याबाबत नवीन मंत्र्यानी विचार करावा
म्हापसा व पर्वरी अशी दोन महसूल भवन व्हावीत अशी मागणी आम्ही पूर्वी केली होती. शिवाय दोन उपजिल्हाधिकाऱयांची मागणीही होती. बार्देश हा उत्तर गोव्यात मोठा तालुका आहे. म्हापशात जेव्हा लोक येतात तेव्हा विविध समस्या उद्भवते. सात मतदारसंघात वेगवेगळय़ारित्या जसे पोलीस स्थानक आहे त्या धर्तरीवर उपजिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा आमचा बेत होता. पर्वरी येथे जागाही विकत घेतली आहे. जेणेकरून मालेतदार उपजिल्हाधिकारी केसेस त्वरित सोडविता येईल. हे आता नवीन महसूल मंत्र्यानी समजून घ्यावे असे मंत्री खंवटे म्हणाले.