रोकडही पोलीसांच्या ताब्यात; मुख्य संशयिताची आज न्यायालयापुढे हजेरी
रत्नागिरी प्रतिनिधी
ठाणे येथील व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर त्यांच्या बॅगेमधील सोने-चांदी संशयितांनी वितळवले होते. हे वितळवलेले सोने-चांदी पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. तसेच खूनाच्या दिवशी व्यापाऱ्यांकडे असलेली रोकडही पोलिसांनी हस्तगत केल्याचे समोर येत आहे. दरम्यान मुख्य संशयित भूषण खेडेकर याला आज सोमवारी पुन्हा एकदा न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आह़े.
पोलीस तपासात भूषण खेडेकर हा कर्जबाजारी झाला होत़ा तसेच तो किर्तीकुमार कोठारी यांचे पैसेही देणे होत़ा कोठारी हे ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी होत़े तसेच ते मोठे व्यापारी होते, ही गोष्ट भूषण याला माहिती होत़ी गेल्या 10 वर्षापासून कोठारी हे रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी येत असत़ त्यामुळे यावेळी कोठारी हे मोठी रक्कम व सोने-चांदी आपल्यासोबत घेवून आल्याचा कयास भूषण याने बांधला होत़ा.
भूषण खेडेकर याने उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने कोठारी यांना आपल्या दुकानात बोलावून घेतल़े यावेळी दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल़ा तसेच मृतदेह रिक्षातून गुहागर तालुक्यातील आबलोलीमधील पऱ्यात टाकून दिल़ा यावेळी कोठारींकडे असलेले सोने व चांदी भूषण याने वितळवून घेतल़े तसेच या सोने व चांदीच्या माध्यमातून त्याने देणेकऱ्यांची देणीही भागवल्याची माहिती समोर येत आह़े दरम्यान हा सर्व ऐवज आता पोलिसांकडून जप्त करण्यात आला आह़े.
कोठारी यांच्याजवळ सोने, चांदी व रोख रक्कम नेमकी किती होती, हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाह़ी त्यामुळे संशयित देत असलेल्या माहितीवरच पोलिसांना अवलंबून रहावे लागत आह़े काहीवेळा संशयित आरोपी हे पोलिसांना विसंगत माहिती देत तपासात सहकार्य करत नाहीत, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयापुढे ठेवण्यात आली आह़े त्यामुळे कोठारी रत्नागिरीत येताना किती लाख रूपयांचा ऐवज घेवून आले होते, या बाबत प्रश्नचिन्ह कायम राहिले आह़े