शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत : विद्यार्थ्यांचे हाल : अनेकांच्या घरात शिरले पाणी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसानंतर रविवारी रात्रीपासून पावसाने आणखीनच जोर धरला. दिवसभर पडलेल्या धुवाधार पावसाने साऱयांचीच दाणादाण उडविली. या पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकाऱयांनी तातडीने शाळांना सुट्टी जाहीर केली. या पावसामुळे अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर, ओमनगर-खासबाग या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन साऱयांचीच तारांबळ उडाली आहे. तर भारतनगर, चौथा क्रॉस येथील घर कोसळून कार भिंतीखाली सापडली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले तर वडगाव येथे घर कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली.
रविवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. सोमवारी सकाळी तर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बघताबघता अनेक उपनगरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे महिला आणि लहान मुलांची तारांबळ उडाली होती. श्रावण सोमवार असल्यामुळे बरेच जण पूजेच्या तयारीत होते. मंदिराला जाण्याच्या तयारीत असताना पावसाचा जोर वाढल्यामुळे साऱयांना घरीच थांबावे लागले.
सोमवार असल्यामुळे विद्यार्थी शाळांना जाण्यासाठी तयार झाले. मात्र शाळेत पोहोचल्यानंतर सुट्टी असल्याचे त्यांना समजले.
या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. ग्लोब थिएटर, गांधीनगर परिसरात पाणी साचून होते. वैभवनगर, विरभद्रनगर या भागात अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसाचा जोर इतका होता की बघता बघता सर्वत्र पाणी होत होते. दुपारी 12 नंतर काहीशी पावसाने उघडीप दिली. पण त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. दिवसभर थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील कामे सुरू आहेत. मात्र या झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी भर रस्त्यातच पाणी साचून आहे. गटारी तुंबून रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱयांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाचा इतका जोर होता की त्यामधून छत्री घेवून चालणे देखील अवघड झाले होते. पाऊस कधी थांबतो, याचीच वाट अनेकांना पहावी लागत होती. मात्र पावसाची जोरदार संततधार सुरूच होती.
या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी व इतर विपेत्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे ग्रामीण भागातील जनता शहराकडे फिरकलीच नाही. अनेक गावच्या रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामुळे शहराकडे येणेच थांबविले होते. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसून येत होते. जोरदार पावसामुळे सतत रहदारी असलेल्या रस्त्यांवर देखील तुरळक गर्दी दिसून आली. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे भाजी विपेत्यांची भाजी पाण्यातून वाहन गेली होती तर ग्राहक नसल्यामुळे अनेकांना ग्राहकांची वाट पावसाचत ताटकळत पहावे लागत होते.
बळ्ळारी नाल्याला पुन्हा पूर
या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पुन्हा पूर आला. शेतकऱयांनी भात लावणी केलेले पिक पुन्हा पाण्याखाली गेले. याचबरोबर इतर शिवारातही पाणी साचून राहिले होते. बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जवळपास 500 हून अधिक एकरमधील शिवारातील भात पिक पाण्याखाली केले होते.
येळ्ळूर रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरीनगरात पाणींच पाणी
येळ्ळूर रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर या परिसरात पाऊस झाल्यानंतर पाणी साचून राहत आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या पावसामुळे गुडघाभरपेक्षाही अधिक पाणी साचून राहिले होते. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तुंचे नुकसान झाले. रात्रभर पाणी राहिल्यामुळे अनेकांना रात्र जागरण करुनच लक्ष ठेवावेलागले. नेहमीच्याच या समस्येमुळे केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ओमनगर-खासबाग, गांधीनगर परिसरात पाणी साचून
बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नाल्याचे पाणी ओमनगर-खासबाग या कॉलनीत शिरले. या नाल्याची सफाई करावी यासाठी नेहमीच पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अर्धवट कामांमुळे अजूनही काही उपनगरांना त्याचा फटका बसत आहे. एक वर्षांपूर्वी या नाल्याची खोदाई केल्यामुळे पूराचा फटका कमी झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी पूर येत आहे. तेंव्हा या नाल्याची खोदाई करणे महत्वाचे आहे.
भारतनगर येथे कोसळले घर
भारतनगर, चौथा क्रॉस येथील विणकर आनंद बिर्जे यांचे घर कोसळले. यावेळी बाजुला पार्किंग करण्यात आलेल्या कारवर भिंत कोसळल्याने दोन कारचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. वडगाव येथेही एक घर कोसळले आहे. त्या घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
फोर्ट रोडवर पाणी, वाहतुकीची कोंडी
जुन्या धारवाड रस्त्यावर पाणी साचून होते. शहापूरकडून येणाऱया रस्त्याला लागूनच हे पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहन चालकांना मोठी समस्या निर्माण झाली होती. दुचाकीस्वारांना तर भर पावसातच भिजत थांबावे लागत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर
शहरापासून जवळ असलेल्या मार्कंडेय नदीला दरवषीच पूर येत आहे. या नदीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे नदीचे पाणी शिवारात जाऊन परिसरातील शेकडो एकर जमीनीतील पिके नुकसान होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा नदीचे पाणी पात्राबाहेर आली असून भात व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. कंग्राळी खुर्द येथील जुने पूल दुसऱयांदा पाण्याखाली गेले आहे.
गुरुवार 11 ऑगस्टपर्यंत बेळगावला यलो अलर्ट
बेळगाव जिह्यामध्ये दि. 8 व 11 तारखेपर्यंत दमदार पाऊस कोसळेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. दि. 8, 9, 10 आणि 11 रोजी पाऊस पडेल असे हवामान खात्याने आपल्या अंदाजामध्ये सांगितले आहे. त्यानंतर पाऊस कमी होईल. त्यामुळे आणखी तीन दिवस हा पाऊस राहण्याची शक्मयता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सुटीची घोषणा, विद्यार्थ्यांची दैना
भरपावसातच विद्यार्थी-पालकांचे हेलपाटे
बेळगावसह खानापूर तालुक्मयात पावसाचे प्रमाण वाढल्याने सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱयांनी सुटी जाहीर केली खरी, परंतु यामुळे विद्यार्थी व पालकांचे पुरते हाल झाले. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर सुटीचा आदेश आल्याने पालकांना शाळेपर्यंत येवून विद्यार्थ्यांना घेऊन जावे लागले. शाळांना सुटी देताना नेहमीच गोंधळ होत असल्याने योग्यवेळी सुटीचा आदेश देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
जाधवनगर परिसरात मागील चार दिवसांपासून बिबटय़ाचा वावर आहे. रविवारी रात्री एका ट्रपकॅमेऱयामध्ये बिबटय़ाचे छायाचित्र कैद झाले. यामुळे तातडीने जिल्हा प्रशासनाने जाधवनगर परिसरातील एक कि. मी. अंतरावरील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा 11 व त्यानंतर 22 शाळांना सुटी देण्याचा निर्णय शहर शिक्षणाधिकाऱयांनी जाहीर केला. त्यामुळे रविवारी रात्री संबंधित शाळांनी पालकांना फोन करून व मोबाईलवर मेसेज पाठवून शाळांना सुटी असल्याचे सांगितले होते.
बेळगाव व खानापूर तालुक्मयात मागील दोन दिवसांत धुव्वाँधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. काही संपर्क रस्ते पाण्याखाली गेल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी सुटी देण्याचा निर्णय घेतला. सकाळी 8.45 च्या सुमारास जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु त्यापूर्वी सकाळच्या सत्रात भरणाऱया शाळा सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू झाल्यानंतर सुटीचा आदेश आल्याने पालकांना फोन करून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याच्या सूचना शिक्षकांना कराव्या लागल्या. आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकाचीच धावपळ सुरू होती. त्यातच शाळांना अचानक सुटी दिल्याने पालक व विद्यार्थ्यांचे हाल झाले.
रिक्षामामांचीही पळापळ
नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडून रिक्षामामा आपापल्या कामावर निघाले. परंतु काही वेळातच त्यांना शाळांमधून फोन करून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामुळे पुन्हा माघारी फिरत शाळांपर्यंत येऊन विद्यार्थ्यांना घ्यावे लागले. या सर्वांमध्ये रिक्षामामांची पळापळ झाली. बरेच विद्यार्थी शाळेबाहेर पावसामध्ये भिजत बस व रिक्षाची वाट पहात उभे असल्याचे चित्र दिसले.
ग्रामीण भागातून येणाऱया विद्यार्थ्यांचे हाल
बेळगाव व खानापूर शहरात ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सकाळीच हे विद्यार्थी घराबाहेर पडून बसच्या प्रतीक्षेत असतात. सोमवारी हे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचल्यानंतर सुटीचा आदेश बजाविण्यात आला. यामुळे पुन्हा बस धरून विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. सुटी होती परंतु भरपावसातच विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू राहिला.