प्रतिनिधी/ सातारा
मागील दोन दिवसांपासुन पावसाचा जोर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. दिवस-रात्र पावसाची रिपरिप ही सुरूच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिह्यामध्ये दि. 7 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे पुढेल दोन दिवस पावसाचा जोर हा असाच राहणार आहे. सततच्या या संततधार पावसाने सातारकर मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
पावसाचे प्रमाण वाढत असल्याने शहरात ही काही ठिकाणी वृक्षे पडण्याच्या घटणा घडल्या. नदी, नाले, कॅनॉल, धरणे यांच्या पाणी पातळीत ही वाढ झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हय़ातील काही पर्यटण ठिकाणी सुरक्षितते खातील पर्यटकांना काही काळासाठी प्रवेश बंदी केली होती. प्रतिवर्षी श्रावण मासात पावसाचे प्रमाण कमी होते, तुरळक पाऊस व ऊन असा ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. यंदा मात्र ऋतु चक्रात चांगलाच बदल झाला आहे. जुन महिना कोरडा गेला त्यादरम्यान पावसाची सर्वांनाच आतुरता लागली होती, पण मागील आठवडय़ा पासुन संततधार असणाऱया पावसाने नको नको से केले आहे.
साताऱयातील प्रमुख रस्त्यांवर तसेच प्रमुख चौकाचौकातून अक्षरशः संचारबंदी सारखा नजारा पाहायला मिळत होता जोरदार पावसात अगदीच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आणि त्यांची वाहने रस्त्यावरून येजा करताना दिसत होती. सतत कोसळणाऱया या पावसामुळे अनेकांनी घरा बाहेर पडणेच टाळले होते. तसेच या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये ही वाढ झाली होती. सर्दी, खोकला, ज्वर, सारख्या आजारांमुळे शहरातील अनेक लहान मोठय़ा रूग्णालयात तपासणी करीता आलेल्या रूग्णांच्या संख्येत ही वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच या पावसामुळे शेती पिकांचे ही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याचे आवाहन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा पुढील काही दिवस पावसाचा जोर हा असाच कायम राहणार आहे. सद्यःसिस्थितीमध्ये सातारा व जावली तालुक्यात खुप मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरु झालेला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश्य पर्जन्यमान परिस्थितीमुळे या तालुक्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होणे, दरड कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होवून जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्यामुळे धोकादायक गावांमधील नागरिकांनी आपल्याकडील पशुधन व इतर महत्वाच्या साधनसामुग्रीसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. आवश्यक असल्यास तहसिलदार यांची मदत घेण्यात यावी असे उपाविभागीय अधिकारी सातारा उपविभाग मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.
अन् वृक्षांची पडझड आणि विद्युत पुरवठा खंडीत
सततच्या पडणाऱया या पावसामुळे शहरातील आझाद महाविद्यालयाच्या समोर व हिंदवी पब्लीक स्कुल, शाहुपुरी या परिसरात ही वृक्षांची पडझड झाली होती. दोनीही ठिकाणी जुन्या भल्या मोठय़ा वडाची झाड पहाटेच्या सुमारास पडली. तसेच विद्युत पोलचे ही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा ही खंडीत झाला होता. शाहुपुरी येथील विद्युत पोल पुर्ण पणे तुटला होता, तर आझाद महाविद्यालया जवळील पोल पुर्ण पणे वाकल्याने येथील तारा तुटल्या होता. हे वृक्ष रस्त्याच्या मुख्य मार्गावर पडल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. या झाडाची मुळे मोठ्ठी असल्याने खासगी कर्मचाऱयांच्या सहाय्याने ही झाडे हलवुन येथील मार्ग पुर्वरत करण्यात आला होता.