प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या आठवडाभरापासून ‘कोसळधार’ पावसाचा जोर बुधवारी चांगलाच ओसरला होता. दुपारी काही भागात नागरिकांना सूर्यदर्शनही झाले होते. पण अधूनमधून सोसाटय़ाच्या वाऱयाबरोबर सरींवर सरींची बरसात कायम आहे. त्यामुळे ‘श्रावणसरीं’चा प्रत्यय येऊ लागला असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘रेड अलर्ट’वर असणारा पाऊस काही दिवस मुसळधार कोसळला. यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र 10 ऑगस्ट रोजी पावसाने काहीसी उसंत घेतल्याचे चित्र आहे. या दिवशी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. त्याबरोबर वाऱयाचा वेग वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आता श्रावणात पावसाचा लपंडाव सुरु झाला आहे. दरम्यान हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 11 ऑगस्टपासून पुढील 3 दिवस पावसाचा ‘पिवळा इशारा’ देण्यात आला आहे. तसेच काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्त़वण्यात आली आहे. पण बुधवारी या पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
संगमेश्वरातील पूरस्थिती ओसरली
संगमेश्वर तालुक्यात सलग तीन दिवसानंतर पुराचे पाणी ओसरले असून पुरातन मंदिरे पुराच्या विळख्यातून सुटली आहेत. संगमेश्वर तालुक्यात पडणाऱया मुसळधार पावसामुळे शास्त्राr, सोनवी आणि बावनदी काठावरची गावे पुराच्या विळख्यात सापडली होती. पुराच्या विळख्यातून या मंदिराची सुटका झाली असून पाणी ओसरल्याने संगमेश्वरवासियांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तालुक्यातील पुराच्या विळख्यानंतर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुकानदार व घरमालकांनी साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.