प्रतिनिधी / पणजी
राहिलेल्या 60 लाईफ गार्डना सेवेत घ्यावे अशी मागणी स्वाती केरकर यांनी केली आहे. लाईफ गार्ड म्हणून काम करणाऱया कामगारांना सेवेतून कमी केल्यानंतर त्यांनी सेवेत घ्यावे म्हणून आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी आश्वासन दिले होते. की मानव विकास संसाधन संस्थेखाली काम देणार, आज कित्येक दिवस झाले तरी 60 कमागार आजही बेकार आहेत. असे स्वाती केरकर म्हणाल्या.
येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वाती केरकर बोलत होत्या त्यांच्या सोबत लाईगार्ड कामगार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्या प्रमाणे सुमारे 40 कामगारांना सेवेत घेतले आहे. आणखिन 60 जण राहिले आहेत त्यांना घ्यावे असेही स्वाती केरकर म्हणाल्या. हे साठही लोक गोमंतकीय आहेत. महाराष्ट्र किंवा कारवारचे नाही परंप्रांतीयांना वगळून एकूण ़100 जण होते त्यांचा विषय आम्ही हातात घेतला होता. त्यातील 40 जणांना सेवेत घेतले आहे. इतरांनी लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी केरकर यांनी केली आहे.