शिवाजी कागणीकर यांचे प्रतिपादन : खानापुरात बेरोजगार महिलांचा मेळावा
प्रतिनिधी /खानापूर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, ही देशाच्यादृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. निवडणुकीवेळी नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता त्यांच्याकडे रोजगाराची अपेक्षा ठेवा, असे विचार ज्ये÷ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी येथे बेरोजगार महिलांच्या मेळाव्यात मांडले. वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी तसेच निधर्मी जनता दलाचे कार्यकारिणी सदस्य रेवणसिद्धय्या हिरेमठ, रवि काडगी यांनी शहरातील बेरोजगार, दारिद्रय़रेषेखालील महिलांचा मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी रेवणसिद्धय्या हिरेमठ होते. यावेळी मेघा कुंदरगी उपस्थित होत्या.
कागणीकर पुढे म्हणाले, कामगार कायद्यानुसार जे हक्क मिळविता येतात ते सनदशीर मार्गाने मिळवूया. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना रोजगारनिर्मिती आवश्यक आहे. कायद्याच्या चौकटीतून शहरातील नागरिकांची रोजगाराची तरतूद नसली तरी याच कायद्याचा आधार घेत आपण आपला हक्क मिळवू शकतो, असे सांगितले. यावेळी ऍड. एन. आर. लातूर म्हणाले, वाढत्या महागाईने सर्वसामान्य कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या हाती काम असणे गरजेचे आहे. तालुक्मयात रोजगाराची संधी नसल्याने येथील जीवनमान उंचावले नाही. कामगारांच्या हक्कांसाठी कायम तुमच्यासोबत आहे. समाजात कामगार कायद्याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे, यासाठी ग्रामीण भागात जागृती मोहीम राबविण्यात यावी. रोहयोंतर्गत आपणास माहिती हवी असल्यास narega. Com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. येत्या काळात महिलांच्या व बेरोजगार कामगारांच्या हक्कांसाठी कायम कार्यरत राहणार असून कामगार, महिलांना मोठय़ा संखेने एकत्रित आणून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारला जाईल. येत्या काही दिवसात कामगार कार्ड मिळवून देण्यासाठी शासनाच्या सुविधा, अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आय. आर. घाडी यांनी दिली.
यावेळी नगरसेविका मेघा कुंदरगी, गंगा गुरव, सविता घाडी, सुरेखा गुंजीकर, रेणुका हुंदरे, सुहासिनी गुरव, लक्ष्मी घाडी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.