वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपच्या दोन माजी पदाधिकाऱयांच्या कथित वादग्रस्त टिप्पणींवरून निर्माण झालेल्या आक्रोशादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता देशात ‘घृणास्पद भाषण आणि इस्लामोफोबियाच्या घटना वाढण्याप्रकरणीचे स्वतःचे मौन सोडावे. मोदींच्या मौन म्हणजे अशाप्रकारच्या घटनांसाठी त्यांचे समर्थन असल्याचे काही लोक मानत असल्याचा दावा थरूर यांनी केला आहे.
अलिकडच्या वर्षांमध्ये भारत सरकारने इस्लामिक देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी प्रभावशाली पावले उचलली आहेत. परंतु अशा घटनांमध्ये या संबंधांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. ईशनिंदा सारखे कायद्याची देशात गरज नाही, कारण अशा कायद्यांचा अन्य देशांमधील इतिहास गैरवापरांनी भरलेला असल्याचे थरूर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
विभाजनकारी वक्तव्ये भारताचा विकास आणि समृद्धीवरून मोदींचा दृष्टीकोनाच कमजोर करत आहेत. कुठल्याही राष्ट्राची प्रगती आणि विकासासाठी सामाजिक एकात्मता आणि सद्भाव आवश्यक आहे. याचमुळे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’च्या नावावर मोदींनी जाहीरपणे अशाप्रकारचे वर्तन रोखण्याचे आवाहन करावे असे थरूर म्हणाले.