मुले अन् मुलींमधील बाल मृत्यूदर झाला समान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दशकांपासून भारताच्या प्रतिमेवर एक डाग लागून राहिला आहे. देशात मुलांना मुलींच्या तुलनेत प्राधान्य देण्याची वृत्ती मोठय़ा प्रमाणावर होती. जन्म घेतल्यावर अनेक मुलींना मारून टाकण्याचे प्रकार घडत होते. परंतु हळूहळू ही वाईट वृत्ती आता बदलू लागली आहे. 2020 पासून ही स्थिती बदलली आहे. आता मुले आणि मुली दोघांचाही बाल मृत्यूदर (इन्फंट मॉर्टेलिटी रेट) समान झाला आहे.
भारतात आता एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुले आणि मुलींमधील बाल मृत्यूदर (आयएमआर) समान झाला आहे. दर 1000 मुलांमागे होणाऱया मृत्यूंना आयएमआर म्हटले जाते. देशात आता मुले आणि मुलींमधील आयएमआर 28 आहे. मागील अनेक वर्षांपासून 16 राज्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींमधील बाल मृत्यूदर अधिक होता. परंतु 2011 पासून यात मोठी घट झाल्याचा खुलासा एसआरएस स्टॅटिस्टिकल रिपोर्ट 2020 मधून झाला आहे.
2011 मध्ये उत्तराखंड वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये मुलींमध्ये बाल मृत्यूदर मुलांपेक्षा अधिक होता. उत्तराखंडमध्ये दोन्हींचा दर समान होता. एसआरएस स्टॅटिस्किल रिपोर्ट 2020 नुसार 5 राज्ये आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मुले आणि मुलींमध्ये बाल मृत्यूदर समान होता. 8 राज्यांमध्ये मुलींमधील बाल मृत्यूदर मुलांपेक्षा कमी राहिला. सर्व राज्यांमध्ये ग्रामीण क्षेत्रांचा बालमृत्युदर शहरी भागांमध्ये अधिक राहिला आहे.
डाटानुसार आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये मुले आणि मुलींमधील आयएमआर समान आहे. परंतु छत्तीसगड, बिहार, आसाम, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तरप्रदेशात अद्याप मुलींच्या तुलनेत मुलांमधील बालमृत्यूदर कमी आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागांमधील बालमृत्यूदरात घट झाली आहे. परंतु शहरी भागांच्या तुलनेत गावांमध्ये मुलींमधील बालमृत्यूदर अधिक राहिला आहे. देशाच्या शहरी भागांमध्ये 2011 मध्ये मुले आणि मुलींमधील आयएमआर दरम्यान मोठे अंतर होते. परंतु 2020 मध्ये मुलींचा बालमृत्यूदर मुलांपेक्षा कमी झाला आहे.
2020 मध्ये मुली आणि मुलींमधील बाल मृत्यूदरात सर्वाधिक अंतर छत्तीसगडमध्ये राहिले आहे. तेथे मुलांमध्ये आयएमआर 35 नोंदविण्यात आला, तर मुलींमधील आयएमआर 41 राहिला आहे. छत्तीसगडचा एकूण बाल मृत्यूदर 48 वरून कमी होत 38 वर आला आहे. 2011 च्या तुलनेत छत्तीसगडमध्ये मुले आणि मुलींच्या आयएमआरमधील अंतर वाढले आहे. बिहार, आसाम आणि कर्नाटकातही हीच स्थिती राहिली आहे.
स्थितीत सुधार
भारतासाठी बाल मृत्यूदरातील मोठी घसरण एक मोठी कामगिरी आहे. ज्या देशांमध्ये बालमृत्यूदर 20 पेक्षा अधिक आहे, अशा देशांमध्ये केवळ भारताच मुले आणि मुलींमधील आयएमआर जवळपास समान आहे. उर्वरित प्रत्येक देशात मुलींमधील आयएमआरमध्ये मोठे अंतर आहे.