मुंबई
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंदशेखरन राव यांनी सांगितले की, समूह ग्राहकांच्यासाठी 5-जी सेवा सादर करणार नाही. त्यामुळे 5-जी संदर्भातील कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तोटय़ामुळे समूहाने काही वर्षांपूर्वी ग्राहक केंद्रीत दूरसंचार सेवा बंद केली, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखरन म्हणाले, समूह 4जी आणि 5जी साठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष पेंद्रीत करत आहे. इतकेच नाही तर 6-जी करीताही आम्ही गुंतवणूक करत असल्याचे समूहाने सांगितले आहे. एका कार्यक्रमात एन चंद्रशेखरन बोलताना म्हणाले, की आम्ही कधीच 5 जी मधून बाहेर पडलो आहोत. त्यामुळे आता त्यामध्ये जाण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
समूह कंपन्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. त्याची मोठय़ा प्रमाणावर अंमलबजावणी होण्यापूर्वी चाचणी केली जाईल या सवलतीबाबत आतापासूनच चौकशी सुरु झाली असल्याचेही सांगितले जात आहे.