दोन्ही ठिकाणी पालिका निवडणुकीचे पडघम : प्रभाग फेररचनेचे मसुदे जनतेसाठी खुले,सूचना सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदत
पणजी ; सांखळी आणि फोंडा पालिकांची मुदत येत्या दि. 20 मे रोजी संपुष्टात येत असून दोन्ही पालिकांच्या प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सांखळीचा मसुदा डिचोलीत तर फोंड्याचा मसुदा फोंडा मामलेदार कार्यालयात जनतेसाठी खुला ठेवण्यात आला असून 10 दिवसांमध्ये इच्छुकांना आपले म्हणणे त्यावर सादर करता येईल. राज्य निवडणूक आयोगाने सांखळी व फोंडा पालिका निवडणुकीसाठी काम सुऊ केले आहे. सांखळी पालिकेच्या प्रभागांची संख्या 13 वऊन 12 पर्यंत खाली आणण्यात आली आहे. फोंडा पालिका 15 प्रभागांचीच राहील. दोन्ही पालिकांसाठीच्या प्रभागांची फेररचना करण्यास राज्य निवडणूक आयोगाने संबंधित मामलेदारांना सांगितले होते. त्यांनी ते तयार केले आहेत. आजपासून पुढील 10 दिवस प्रभागांच्या फेररचनेचे मसुदे हे संबंधित मामलेदार कार्यालयात जनतेसाठी खुले असतील. त्यावर विचारविनिमय कऊन 10 दिवसांत आपले म्हणणे किंवा सूचना मामलेदार कार्यालयात सादर करायच्या आहेत. त्यावर मामलेदार अंतिम निर्णय घेऊन आपला अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करील. आयोग त्यावर शिक्कामोर्तब करील आणि त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुऊ केली जाणार आहे.
कसोटी मुख्यमंत्र्यांची, कृषीमंत्र्यांची!
सांखळी पालिकेसाठी मुख्यमंत्री आणि भाजपने आतापासून कंबर कसली आहे. सध्या या पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. यातील तिघां नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश कऊ द्यायचा आणि त्यानंतर त्यांना भाजपतर्फे उभे करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनोदय आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी सांखळी नगरपालिका प्रतिष्ठेची ठरली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील एकमेव पालिकेवर काँग्रेसची सत्ता गेली पाच वर्षे चालू आहे. यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांनी पालिका ताब्यात घेऊन पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे ठरविले आहे. फोंड्यामध्ये मगो व भाजप असा संघर्ष होता. सध्या मगो आणि भाजप एकत्र आहेत. कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र हे नगराध्यक्ष आहेत. मगोने या निवडणुकीत सहभागी व्हायचे नाही, भाजपला पाठिंबा देण्याचे ठरविल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, फोंड्यातील भावी नगराध्यक्ष कोण? हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. रवी नाईक हे यावेळी सर्वशक्ती पणाला लावून भाजपचे मंडळ सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मूळ भाजपची व सध्या दुखावली गेलेली मंडळी एकत्र येऊन फोंड्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहे.