आचरा / प्रतिनिधी
आचरा येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व जेष्ठ शिवसैनिकांचा झाला आमदारांच्या हस्ते सन्मान
The umbilical cord with the common people will never be broken – Aa. Vaibhav Naik
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आचरा विभाग व युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश तोंडवळकर यांच्या वतीने आचरा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ६५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व जेष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आचरा दशक्रोशीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी केक कापून त्याना शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर, विनायक परब, शिल्पा खोत, गणेश तोंडावळकर, शाम घाडी दिलीप कावले, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, वायंगणी सरपंच रुपेश पारकर, संजय केळूसकर, प्रकाश वराडकर, अनुष्का गावकर राजू नार्वेकर, समीर लब्दे, माया सावंत, केदार परुळेकर अविराज परब, अनिल परब, नितीन घाडी व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कदापी तुटू देणार नाही
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले कीं या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या उत्साहात या ठिकाणी जमून मला आशीर्वाद दिलात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता गेल्या दोन वेळा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांमुळे हे शक्य झालं आणि याची मला पूर्ण जाणीव आहे.
गावात विकासकामे झाली पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी परिवर्तन आपण केलं. आणि त्या परिवर्तनाची जबाबदारी म्हणून या मतदार संघात विकासनिधी आणून प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. शिवसेनेमध्ये फटाकूट झाल्यानंतर काही नेते सोडून गेलेत तरी उद्धवजीनीं आपल्या बरोबर किती लोक आहेत याचा विचार करत न बसता आपला लढा चालू ठेवला आहे. आज आपल प्रेम असल्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच विजयी होऊ. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच विकास कामासाठी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कदापी तुटू देणार नसल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.