नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप तसेच केंद्र सरकार यांच्या विरोधात ब्रिटनमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा संसदेत मंगवारी पुन्हा गाजला आहे. गांधी यांनी त्यांच्या विधानांसंबंधी देशाची क्षमायाचना केली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली होती. मात्र, काँगेसने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.
संसदेतील गेंधळाला सरकारच कारणीभूत आहे. सरकारलाच सदनाचे कामकाज चालविण्याची इच्छा नाही. त्यामुळे कामकाजात व्यत्यय येत आहे. राहुल गांधोंच्या विधानांचा मुद्दा पुढे करुन सरकारचे मंत्री संसद ठप्प करीत आहेत. राहुल गांधींना देशाची क्षमायाचना करण्याचे काहींही कारण नाही. क्षमायाचना सरकारी पक्षानेच करावी. संसदेतील गदारोळाला तेच कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांनी आपले वर्तन सुधारावे, असा सल्ला काँगेस नेते अधीररंजन चौधरी यांनी दिला.
अदानींचा मुद्दा
अदानी उद्योगसमूहाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी विरोधु पक्षांची आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संसदेत गदारोळ होत आहे. सोमवारी राज्यसभेचे कार्यं पुन्हा सुरु झाल्यानंतर दोन मिनिटांच्या गदारोळामुळे सकाळी 11 वाजताच सदनाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते, असा आरोप काँगेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. भाजपने तो फेटाळला होता.
भाजपचा काँगेसवर प्रतिहल्ला
काँगेसच्या आरोपांना भाजपच्या सदस्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. संसदेत कामात व्यत्यय कोण आणते, हे वेगळे सांगावयास नकोच. ते सर्वांना टीव्हीवरुन दिसत आहेच. काँगेस ही राहुल गांधेची नाटक कंपनी आहे. खरगे हे काँगेसचे अध्यक्ष आहवेत. पण ते नामधारी आहेत. त्यांना कशी वागणूक दिली जाते हे सर्वांनाच ज्ञात आहे. काँगेसने विनाकारण लोकशाहीचे तारणहार असल्याचा आव आणू नये. गांधी यांनी ब्रिटनमध्ये देशाचा अवमान करणारी विधाने केली. क्षमा मागणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण ते न करता त्यांनी उलट संसदेत गोंधळ घातला ही बाब सर्वांच्या परिचयाची आहे. राहुल गांधी घडघडीत खोटे बोलतात. आपला माईक बंद केला जातो असा बनावट आरोप करतात. यामुळे देशाची प्रतिमा विनाकारण मलीन होते. त्या विरोधात आम्ही आहोत. देशाची क्षमायाचना करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे.
राज्यसभेतही गदारोळ
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही मंगळवारी जोरदार गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे सकाळच्या सत्राचे कामकाज करणे अशक्य झाले. या सदनातही अदानी मुद्दय़ावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पीठासीन अध्यक्षांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. मात्र भोजनाच्या विश्रांतीनंरही गोंधळ सुरुच राहिल्याने कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.
सदनाबाहेर निदर्शने
लोकसभेचे कामकाज सकाळच्या सत्रातच स्थगित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सदनाबाहेर सरकारविरोधात निदर्शने केली तसेच धरणे धरले. सरकार आम्हाला बोलू देत नाही, असा त्यांचा आरोप होता. सरकारने अदानी समूहासंबंधी चौकशी करण्यासाठी संसदीय समिती नेमावी हा आग्रह आम्ही सोडणार नसल्याचे या खासदारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.