माधवराव खंडेराव मोरे हे नाशिक जिह्यातील एखाद्या व्यक्तीचे नाव, उर्वरित महाराष्ट्रात सहज कोणाच्या आठवणीत राहील असे नाही. मग वयाच्या 88 व्या वषी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, याची दखल इकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात कशी घेतली जाणार? पण, काही लोकांच्या कामाचा उपकारच इतका मोठा असतो की त्याची आठवण ठेवली नाही तर तो कृतघ्नपणा ठरावा. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर उसाला आज जो किमान चांगला दर मिळतो आहे, त्याची सुरुवात नाशिकच्या माधवराव मोरे नाना यांच्या उग्र आंदोलनाने झाली. ज्यांच्यापुढे जगातील शंभरेक देशांचे पंतप्रधान आपल्या देशाला मदतीची मागणी करायला उभे असायचे, असे युनोतील पद सोडून भारतातील शेतकऱयाचे अर्थशास्त्र दुरुस्त करण्यासाठी परतलेले शरद जोशी यांचे ते आरंभीचे खंदे समर्थक. उसाला तीनशे आणि कांद्याला शंभर रूपये किमान भाव देण्यास शरद जोशी, माधवराव मोरे, माधवराव बोरस्ते या त्रिमुर्तीने तत्कालीन ए. आर. अंतुले सरकारला भाग पाडले. त्यासाठी प्रसंगी गोळीबार आणि बंदुकीच्या दस्त्यांचे माथ्यावर प्रहार झेलले. म्हणून आज ऊस हे भारतातील शेतकरी जनतेला हमखास उत्पन्न देणारे, नगदी पीक बनले आहे. सहकारातील नेत्यांकडून शेतकऱयांनी जसा भाव वसूल केला तसाच भाव व्यापारी वर्गाकडूनही वसूल झाला असता. मात्र शेतकऱयांच्या या शक्तीला नेहमीच रोखले गेले. माधवराव मोरे एकाच वेळी ऊस, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱयांना जागे करत होते. पंजाबमध्ये जाऊन तिथल्या शेतकऱयानाही एक करत होते. द्राक्षावर प्रक्रिया करून वाईन उद्योग उभारणीसाठी त्यांनी परदेशातून तंत्रज्ञानही आणले. वाईन व्यवसायाला तत्कालीन सरकारने देशांतर्गत विक्री आणि निर्यात परवानगीचे धाडस दाखवले नाही. ( वाईन मॉलमध्ये विकायला अगदी साडेतीन महिन्यापूर्वीपर्यंत विरोध झाला आहे) पुढे सरकारने वायनरीचे धोरण खूप उशीरा आणले आणि जगाच्या मागे राहिल्याने फसले. हीच अडवणूक शेती तोटय़ात आणण्यास कशी कारणीभूत आहे, शेतमालाचा भाव ठरवताना शेतकऱयाचे आणि त्याच्या कुटुंबाचे कष्ट मोजले तर अव्यवहारी ठरून भाव वाढ होते, हे शेतमालाचा दर ठरवणाऱया सरकारला वाटते. अशाने शेतकरी कधीच फायद्यात येणार नाही. हे शरद जोशी यांनी पटवून सांगितले. ते माधवरावांनी समजून शेतकऱयांच्या भाषेत सांगण्याचे मोठे काम केले. शेतकऱयांची ही मुलूख मैदान तोफ धडाडली की सरकार धसका घ्यायचे. मंत्री, मुख्यमंत्री खुर्चीवरून उठून माधवरावांना मान द्यायचे. त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रभर शेतकरी संघटना फोफावली. शेतकरी आणि त्यांची बायको-मुले वेडय़ासारखी संघटनेच्या मागोमाग महाराष्ट्रभर फिरली. दुःख, अपमान सोसून शेतकऱयाचा मेंदू बधिर झाला आहे. आता त्याला त्याचेही काही वाटेनासे झाले आहे. हे वास्तव ते उदाहरणासहित लाखा लाखांच्या सभेला सांगायचे. शेतकरी आणि नांगराचा बैल एकसारखाच. मशागतीवेळी घुंगरं वाजली की बैलाला आपण मालक असल्यासारखे वाटते. पण पीक तारले की बैलाच्या तोंडाला मुसक्मया आवळतात. शेतकरी ऊस कारखान्यात जाईपर्यंत मालक, नंतर कारखान्याच्या गेटवर शिपाई थांबवतो, परवानगी नंतर कारखान्यात सोडतो, पन्हाळीतली मूठभर साखर खाऊन बाहेर आले की डोक्मयापासून नखापर्यंत तपासून सुटका! व्वारे मालक! आम्हाला यांनी जाती, पातीसाठी मते मागितली पण, कधी भले केले नाही. अशा उदाहरणांनी शेतकरी पेटून उग्र आंदोलने व्हायची. गेल्या तीन-चार दशकात शेतकरी आंदोलनात सामान्य कुटुंबातून त्यामुळेच अनेक अभ्यासू, धडाडीचे आणि बिनतोड बोलणारे कार्यकर्ते, वक्ते, नेते घडले. त्यांच्या भाषणाचा पाया हा माधवराव मोरे आहेत. पाच धरणाचे पाणी माझ्या तालुक्मयात येते, महामार्ग, वीज सर्व प्रकारची सुबत्ता आहे, अवघ्या चार तासावर बंदर आहे. पण तरीही माझ्या तालुक्मयात एकही शेतकरी मरण्यापूर्वी सोसायटीचे कर्ज भागवू शकलेला नाही. बापाचे कर्ज पोरगा भागवत जगतो आणि त्याच्या जन्मातही त्याची शेती कधी फायदा देत नाही, पुढच्या वेळी स्थिती बदलेल या आशेवरच शेतकरी जगतो, मरतो हे वास्तव ते महाराष्ट्रभर मांडत राहिले. अगदी आजही शेती फायद्यात आणण्यास आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करत आहोत, असे सरकार सांगत असले तरी, जेथे या सुविधा आहेत तिथला शेतकरी अजूनही फायद्यात नाही. कारण, त्याच्या उत्पादित मालाची किंमत ठरवण्याचे अधिकारच त्याला नाहीत. त्याच्याभोवती सरकारी निर्णयाचे फास आवळून त्याला हतबल केले जाते. हे म्हणणे आजही कालसुसंगत आहे. पण ते 1980 मध्ये सांगण्याचे धाडस माधवराव मोरे करत होते. 1978 मध्ये मोरारजी सरकारने कांद्यावर प्रथम निर्यात बंदी लादली. तेव्हा चाकण येथे शरद जोशी यांनी प्रथम आंदोलन केले. 1980 मध्ये माधवराव मोरे यांनी नाशिकमध्ये ते आंदोलन नेले. कांद्याचे भाव कमी झाल्याने त्यांनी रास्ता रोको केला आणि त्यांच्या तावडीत सापडले तत्कालीन खासदार कहांडळ. खासदारांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने संतापलेल्या माधवरावांनी खासदारांचे श्रीमुख लाल केले. पुढे अपेक्षित तेच झाले. पोलिसांनी गोळीबार केला. दोन शेतकरी ठार झाले. जखमी शेतकऱयाला खांद्यावरून उचलून घेऊन जात असताना मोरे यांच्या डोक्मयावर पोलिसांनी बंदुकीचा दस्ता मारला. त्यात त्यांना झालेली इजा पुढचे संपूर्ण आयुष्यभर त्यांना वेदना सहन करुन जगण्यास कारणीभूत ठरली. पण आंदोलन थांबले नाही. 10 नोव्हेंबर 1980 च्या पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील आंदोलनावर अश्रूधुर आणि गोळीबार झाला. दोन शेतकरी मारले गेले. 19 दिवस रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली. पण त्यातून कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱयांची कायमची कोंडी फुटली. आपल्या मालाला दर देण्यासाठी एक अधि÷ान त्यांना निर्माण करून देता आले. त्या आधारावरच आजही शेतकरी दर मागण्याचा हक्क राखून आहे. माधवराव नाना गेले तरी त्यांचा इतिहास बनला आहे. अर्थतज्ञ वि. म. दांडेकर आणि त्यांचे पुण्यात झालेले वाक्मयुध्द अजरामर आहे. शेतकरी शेतीचा प्रश्नही कायम आहे आणि तो सोडवायचा तर अशा माणसांची स्मृती ही कायम जपली पाहिजे.
Previous Articleके. व्ही. कामत रिलायन्सचे नवे स्वतंत्र संचालक
Next Article आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजार वधारत बंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.