काेल्हापूर : जिल्ह्यात कालपासून (kolhapur rain update) झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शहरातही रविवारी मध्यरात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे (panchganga rever owerflow) पाणी बाहेर पडले आहे. सध्या पंचगंगा नदी २९ फुटांवरुन वाहत असल्याने पुढील चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाची (NDRF) दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत.
रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर व सोमवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी काही अंशी पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत(सोम) ‘राधानगरी’, ‘कासारी’, ‘कडवी’, ‘कुंभी’, ‘पाटगाव’, ‘कोदे’, ‘दुधगंगा’, ‘घटप्रभा’, ‘जांबरे‘, या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. तर आज दिवसभरात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून ३३ टक्के धरण भरले आहे. तर कृत्रिम दरवाज्यातून ११०० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी २९ फुटांवर पोहोचली असून, शिरोळ, तेरवाढ, शिंगणापूर यांच्यासह २८ बंधारे पाण्याखाली गेले. आज रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाणी पात्राबाहेर पडले आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा (MID) इशारा दिल्याने प्रशासकीय पातळीवर सर्व आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.