निर्बंध हटल्याने मोठय़ा प्रमाणात होऊ लागले विवाह : डॉल्बीच्या दणदणाटाने जनता हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे लग्न समारंभावर निर्बंध घालण्यात आले होते. मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावा, असे नियम करण्यात आले होते. मात्र यावषी कोरोना कमी झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठय़ा उत्साहात लग्न समारंभ पार पडत आहेत. गुरुवारी लग्नाच्या मुहूर्तादिवशी अनेकांनी लग्नाचा बार उडवून दिला. मात्र निर्बंध हटल्यामुळे डॉल्बीचा दणदणाट वाढला होता. यामुळे सर्वसामान्य जनता काहीशी हैराण झाली. तेंव्हा डॉल्बीच्या आवाजावर थोडेसे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरातील ग्रामीण भागामध्ये गुरुवारी जास्तीत जास्त विवाह सोहळय़ांचा धुमधडाका पहायला मिळाला. लग्नांसाठीच्या वरातींच्या गर्दीने सर्वत्र वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. एकाच दिवशी अनेक जण विवाह वेदीवर चढल्याने आमंत्रितांचीही तारांबळ उडत होती. रणरणत्या उन्हात लग्न सराईला खऱया अर्थाने सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. तब्बल दोन वर्षांनंतर इतक्मया मोठय़ा प्रमाणात विवाह समारंभ पार पडल्याची चर्चा सुरू होती.
नोव्हेंबर महिन्यापासून विवाह समारंभांना प्रारंभ झाला असला तरी ही संख्या तुरळक होती. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे उडालेल्या आर्थिक हाहाकाराचा फटका लग्नाच्या मोसमावरही पहावयाला मिळाला होता. यापूर्वी मुहूर्तांची संख्या कमी असल्याने यंदाचा मोसम अद्यापपर्यंत म्हणावा तसा रंगला नव्हता. गुरुवारी मात्र त्याची सुरुवात झाली. जिकडे पहावे तिकडे विवाह सोहळे रंगले होते. यामुळे मंगलकार्यालयेही हाऊसफुल्ल गर्दीने फुलली होती. कोरोना उद्रेकामुळे दोन वर्षांपासून मंगल कार्यालये, बॅण्ड, डॉल्बी, मंडप, डेकोरेटर्स, स्वयंपाकी यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता पूर्ववत लग्न समारंभाला सुरूवात झाल्याने या सर्वांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी एकाचवेळी अनेक आमंत्रणे आल्यामुळे नेमके कोठे जावे? या संभ्रमात अडकलेल्या मंडळींना धावपळ करावी लागली. एका ठिकाणी अक्षता, दुसरीकडे जेवण तर तिसरीकडे नुसती भेट देण्याची वेळ नागरिकांवर येत होती. येत्या महिन्याभरात दररोज हे चित्र पहावयास मिळणार आहे, असे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लग्न समारंभाला आमंत्रणच नव्हते. साधी पत्रिकाही काढण्यात आली नव्हती. केवळ 25 ते 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडायचा असल्याने विवाह करणाऱया मंडळींनाही समस्या निर्माण झाली होती. कोणाला आमंत्रण द्यायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. मात्र यावषी मोठय़ा उत्साहाने आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रण देऊन विवाह समारंभ उत्साहात साजरा करत आहेत.
वरातींमुळे वाहतुकीवर ताण
गुरुवारी वरातींमुळे वाहतुकीवर काही ठिकाणी मोठा ताण निर्माण झाला होता. रहदारी पोलिसांनीही याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज चारीही बाजूंनी वराती व त्यातच वाढत्या वाहनांची गर्दी होत होती. त्यामुळे रहदारी पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. ऊन आणि उकाडा यामुळे सारेजण हैराण झाले होते. लग्न म्हटले की डोक्मयावर फेटा, अंगात कोट असा पेहराव करावा लागतो. मात्र उष्म्यामुळे केवळ अक्षताच्यावेळी हा पेहराव घालून त्यानंतर तातडीने तो काढून नियमित वापरणारे कपडेच परिधान करताना दिसत होते.
बॅण्ड, डॉल्बी, वाजंत्रींना यावर्षी अच्छे दिन
बॅण्ड, डॉल्बी इतर वाजंत्री मंडळींनी यावषी काम मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. काम नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र यावषी बऱयांपैकी विवाह समारंभ होत आहेत. त्यामुळे आम्हाला काम मिळत आहे. याबद्दल त्यांच्या चेहऱयावर देखील समाधान दिसत होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना कोरोना यापुढे कधीच येऊ नये, अशीच आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहे, असे सांगितले.