पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : सततच्या पावसामुळे नागरिक हैराण : सुक्मया चाऱयाचा प्रश्न गंभीर : शेतकरी हतबल
वार्ताहर / किणये
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने तालुक्मयात हजेरी लावली आहे. यामुळे शिवारातील भाजीपाला व सुक्मया चाऱयाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. सततच्या पावसाने नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. तर रात्री जोरदार पाऊस होता. सर्वाधिक पाऊस हा तालुक्याच्या पश्चिम भागात झाला. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले.
यंदा हवामानात कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. ऐन उन्हाळय़ाच्या दिवसातच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पावसाळय़ाच्या आधीच मान्सूनचे चित्र दिसून येत आहे. या पावसामुळे साऱयांचीच झोप उडाली असून ऐन उन्हाळय़ाच्या दिवसात छत्री व रेनकोटचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी तालुक्मयात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली होती आणि आता मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला असल्याने शिवारातील मिरची, टोमॅटो, बिन्स, वांगी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱया पावसामुळे शेतात कापून ठेवलेली ज्वारी व मका खराब झाला आहे. ज्वारीचा कडबा व मका जनावरांसाठी सुका चारा म्हणून वापरतात. पावसामुळे हा चारा खराब झाल्यामुळे जनावरांना सुका चारा आणायचा कोठून, हा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.
पिंजर खराब झाल्याने समस्या
बरेचसे शेतकरी जनावरांसाठी पिंजर आणून ठेवतात. पावसाने या गवत गंज्याही खराब झाल्या असून पिंजर काळपट रंगाचे दिसू लागले आहे. त्यामुळे हा सुका चाराही जनावरांना खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे.