आयटी कंपन्यांमध्ये परतले कर्मचारी : 2 लाख नव्या उमेदवारांना संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना रुग्णसंख्येमध्ये कपात झाल्यानंतर त्याचप्रमाणे विविध निर्बंध उठवण्यात आल्यानंतर आता परिस्थिती सर्वसामान्य होत असून आयटीसह विविध क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आता आपल्या कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम ऑफिस’साठी बोलावण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.
यामध्ये आयटी कंपन्यांनी बहुतेक करून पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळामध्ये संसर्गाचे प्रमाण आटोक्मयात आणण्यासाठी विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना घरातून काम करण्याचे अर्थात व वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली होती. परंतु आता परिस्थिती सामान्य झाली असून कोरोनाचे प्रमाण जवळपास संपल्यातच जमा असून याचाच आढावा घेत कंपन्यांनी आता घरातून काम करणाऱया आपल्या कर्मचाऱयांना पुन्हा ऑफिस जॉईन होण्यासाठी आवाहन केले आहे.
2 लाख जणांना संधी
या अनुषंगाने देशातील व बहुराष्ट्रीय आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आगामी काळामध्ये नव्या उमेदवारांची भरती करण्याचीही योजना बनवली असल्याचे समजते. भारतामध्ये चालू आर्थिक वर्षात विविध कंपन्यांकडून 1 लाख 80 हजार ते 2 लाख कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.