आमदार अंजली निंबाळकर यांची कक्केरी येथे प्रचारफेरी : काँग्रेसच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद
खानापूर : काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष असून तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत नसल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. महागाई, बेरोजगारी यामुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र भाजप सरकार गुर्मित असल्याने त्यांना सामान्य जनतेच्या भावनांची कदर नाही. यासाठी काँग्रेसने राज्यातील जनतेचा हिताचा विचार करून विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यासाठी खानापूर तालुक्यातील नागरिकांनी काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसचे हात बळकट करा, असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी केले. कक्केरी जि. पं. क्षेत्रातील होलीकोत्तल येथे झालेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या होत्या. त्यांच्यासंमवेत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कक्केरी जि. पं. क्षेत्रातील गावांत काँग्रेसने सोमवारी उमेदवार अंजली निंबाळकर यांच्याच नेतृत्वाखाली प्रचारदौरा केला. यावेळी कक्केरी, हंदूर, होलीकोत्तल, सुरापूर, केरवाड यासह इतर गावात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच महिला संघांच्या सभा घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात केले. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर यांनी प्रत्येक गावात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन महिलावर्गाशी चर्चा केली. मतदारांनी प्रत्येक गावात उत्स्फूर्तपणे निंबाळकर व काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा देत स्वागत केले. कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रात राबविलेल्या विकासकामासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच भविष्यात या भागात कोणत्या योजना आवश्यक आहेत. याबाबत मतदारांशी चर्चा केली. आणि आमदार झाल्यानंतर तातडीने कक्केरी विभागातील विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
अंजली निंबाळकर यांनी चुलीवर केली भाकरी
महिला संघाशी चर्चा करताना अंजली निंबाळकर यांनी महिला मतदारांच्या घरात जाऊन चुलीवर भाकरी करत महिलांशी चर्चा केली. व काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.