प्रतिनिधी /वाळपई
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते राजभवनवर प्राकृतिक शेती (Natural Farming) या कार्यक्रमात अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र-वाळपई (गोशाळेचा ) सन्मान करण्यात आला.
केंद्राचे अध्यक्ष हनुमंत चंद्रकांत परब यांनी तो मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवरसजी, गोव्याचे राज्यपाल पी. एस. पिल्लई जी, कृषिमंत्री रवी नाईक, पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.
सत्तरी तालुक्मयातील नाणूस या ठिकाणी कार्यरत असलेल्या गो शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे कार्य होत आहे. भटक्मया गुरावर या ठिकाणी चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. पूर्णपणे सामाजिक स्तरावर ही गोशाळा चालत असून अशा गोशाळांसाठी सरकारबरोबर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
प्राकृतिक शेती व गोमातामुळे आपण येणाऱया काळात आपली भूमाता वाचू शकतो. यासाठी नागरिकांनी गोमातेचे महत्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱया काळात आपल्याला निरोगी जीवन जगायचे असेल तर गोमातेचे रक्षण व भूमीचे प्रदूषणापासून संवर्धन तेवढेच महत्त्वाचे असल्याचे गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवरासजी यांनी सांगितले.