निसर्ग कोपून सत्तरीत महापुराचा तडाखा
उदय सावंत/वाळपई
निसर्ग कोपल्यामुळे गेल्या वषी 23 जूनला सत्तरी तालुक्मयाला महापुराचा विळखा बसला. यात सुमारे 8 कोटींची हानी झाली होती. अनेकांची घरे वाहून गेली. शेती बागायतींची प्रचंड नुकसान झाले. पुले कोसळली. रस्ते वाहून गेले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. याला आज जवळपास एक वर्ष पूर्ण झाले. मात्र अजून पर्यंत सरकार पातळीवरून आवश्यक स्वरूपात मदत मिळालेले नाही.
खडकी भागातील हरिजन बांधवांची कोसळलेली घरे स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने उभारलेली आहेत. मात्र अन्य ठिकाणी ज्या घरांचे नुकसानी झालेली आहे. त्या ठिकाणी मात्र सरकारने अद्यापही कोणतीही मदत दिलेली नाही. शेती बागायतदार नुकसानग्रस्तांना सरकारने कृषी खात्याच्या माध्यमातून काही प्रमाणात भरपाई दिली. मात्र अनेक छोटे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे सत्तरी तालुका गतवर्षीच्या महापुराच्या ताडाख्यातून सावरलेला नाही. यामुळे संतप्त शेतकरी बांधव व नुकसानग्रस्तांनी सरकारने या संदर्भात विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अचानक ओढवले महापूराचे संकट
23 जुलै रोजी सत्तरी तालुक्मयाला महापुराचा फटका बसला. अचानकपणे वाळवंटी, म्हादई, वेळूस रगाडा यासर्वच नद्यांना मोठय़ा प्रमाणात पाणी आले व महापुराचा विळखा पडला. अचानकपणे पडलेला विळखा यामुळे स्थानिकांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ उडाली व प्रत्येक जण आपले घर व आपला घरसंसार सावरण्यासाठी धडपडत होते. एका बाजूने सरकारची यंत्रणा महापुराचा विळखा दूर करण्यासाठी झटत होती तर दुसऱया बाजूने नुकसानग्रस्त आपल्या रक्षणासाठी धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. यामुळे दोन दिवस अक्षरशः सत्तरी तालुक्मयात हाहाकार निर्माण झाला होता.
पैकुळ पूल गेला वाहून
या महापुरात पैकुळ येथील पूल वाहून गेला. यामुळे पैकुळ भागाचा संपर्क गुळेली भागातून पूर्णपणे तुटला. त्याचे पडसाद आजही उमटताना दिसत आहे. सरकारने सदर नदीवर पूल उभारण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र सदर पुलाचे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नाही. गेल्या पंधरा दिवसापूर्वी पुन्हा एकदा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सरकारने बांधलेला पदपुल पाण्याखाली गेला?. यामुळे ग्रामस्थांना पुन्हा एकदा याचा फटका बसला. अद्याप पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही.
खडकी, अडवई, कणकिरे घरे जमीनदोस्त.
महापुराचा जास्त फटका खडकी, बाराजण ,अडवई या भागाला बसला. खडकी येथील जवळपास सहा हरिजन बांधवांची घरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. यामुळे सदर कुटुंबावर मोठय़ा प्रमाणात बेघर होण्याची पाळी आली. तर अडवई येथील एका घराला व कणकरे येथील दोन घरांना मोठा फटका बसून घरे जमीनदोस्त झाली व कुटुंबाचा संसार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. खडकी येथील हरिजन बांधवांना त्यांची घरे पुन्हा उभारण्यासाठी स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी मदत केली.
शेती बागायतीलाही मोठा फटका
सर्वच नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे पाण्याचा प्रवाह शेजारी असलेल्या शेती बागायतीमध्ये घुसला. केळी, नारळ ,सुपारी ,आंबे अशा प्रमुख पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. याचा अहवाल स्थानिक विभागीय कृषी कार्यालयाच्या माध्यमातून सरकारकडे सादर केला. मात्र अवघ्याच शेतकरी बांधवांना याची मदत मिळाली. मात्र 50% शेतकरी अद्याप वंचितच आहेत.
महापुरामुळे सरकारची यंत्रणा सतर्क
म्हादई नदीला पूर आल्यामुळे फटका बसल्याचे प्रथमदर्शी आढळून आले आहे. याबाबत सरकारी यंत्रणा जागृत होऊन सध्या जलसिंचन खात्यातर्फे गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्या ठिकाणी नदीचे पात्र अरुंद आहेत त्यांच्या दुतर्फा संरक्षक भिंती उभारणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पावसाळय़ापूर्वी याबाबत कार्यवाही होणे गरजेचे होते. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही. यामुळे यापुढे महापुराची स्थिती निर्माण झाल्यास फटका बसण्याची भीती कायम आहे.