जनसंपर्क सभेत केवळ आकडेवारीच सादर, प्रत्यक्षात सामान्यांची नाही कदर : गुन्हय़ांचा तपास करून सर्वसामान्यांना सुरक्षिततेचा भरवसा देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात सुरू असलेल्या चोऱया, घरफोडय़ांबरोबरच आता दरोडेखोरांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे खासकरून उपनगरे व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगावात पोलीस यंत्रणा जागी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हानच उभे केले आहे.
दोन दिवसांपूर्वी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार बेळगाव दौऱयावर आले होते. ते बेळगावात असतानाच राणी चन्नम्मानगर परिसरात एका दांपत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील दागिने पळविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे उपनगरातील घरे किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
प्रकाश काशिनाथ नाडगौडा (वय 66) या वृद्धाची दरोडेखोरांबरोबर झटापट झाली आहे. त्यांनी मोठय़ा धाडसाने दरोडेखोरांचा सामना केला. अर्जुन कॉलनी परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोरांचा माग काढण्यात येत आहे.
प्रकाश नाडगौडा यांच्या घरात बनियन व बर्मुडा परिधान केलेले चौघे जण शिरले. त्यांच्या पत्नीच्या हातातील दहा ग्रॅमच्या बांगडय़ा, चार ग्रॅमचे मंगळसूत्र, वन ग्रॅम गोल्ड सोन्याचे दागिने, पाच हजार रुपये रोख असा ऐवज पळविला आहे. बेळगावला दरोडय़ाचे प्रकार काही नवे नाहीत. यापूर्वीही अनेक प्रकार घडले आहेत. काहींचा तपास झाला आहे तर काहींचा तपासही लागलेला नाही.
रविवार दि. 27 मार्च रोजी होनगा येथे दरोडय़ाचा प्रकार घडला होता. रात्री 10.20 वाजण्याच्या सुमारास उद्योजक प्रवीण निरंजन (वय 35) हे रात्रीच्या जेवणानंतर टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहात होते. त्यावेळी मास्क, मंकी कॅप व हातमोजे घातलेले तीन दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. प्रवीण यांच्या कपाळावर पिस्तूल रोखण्यात आले. या प्रकरणानंतर आरडाओरडा करणाऱया त्यांच्या पत्नीच्या गळय़ावर विळा ठेवण्यात आला होता.
चोऱया, घरफोडय़ांत वाढ
दरोडेखोरांनी त्यांच्या कपाटातील 1 लाख 30 हजार रुपये रोकड पळविली होती. घरातून बाहेर जाण्यापूर्वी पिस्तूलच्या मुठीने प्रवीण यांच्या डोक्मयावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आजतागायत या प्रकरणाचाही तपास लागला नाही. चोऱया, घरफोडय़ा तर नित्याच्याच झाल्या आहेत.
दरोडय़ाच्या या घटनांमागे स्थानिक गुन्हेगार आहेत की आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार बेळगावात पुन्हा सक्रिय झाले आहेत, याचा उलगडा झाला नाही. यापूर्वी अनेक टोळय़ांनी बेळगाव परिसरात हैदोस घातला आहे. खासकरून आंध्रप्रदेशमधील स्टुअर्टपुरममधील मेंढरगुत्ती महाराजा टोळीने दहा वर्षांपूर्वी अनेक धनिकांची घरे लक्ष्य बनविली होती. या एकाही प्रकरणाचा तपास लागला नाही. अनेकवेळा बेळगाव पोलिसांनी आंध्रचा दौरा केला, मात्र दरोडेखोरांच्या फोटोशिवाय त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
पुण्याच्या कांजरभाट टोळीनेही बेळगाव परिसरात अनेक ठिकाणी दरोडे घातले आहेत. माळमारुती येथील जुन्या पोलीस स्थानकाशेजारीच दरोडय़ाची घटना घडली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर दरोडेखोरांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारावर गोळीबार झाला होता. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. कांजरभाट टोळीचे हे कृत्य असल्याचे उघडकीस आले होते. त्यांचाही शोध लागला नाही.
गुन्हेगार पोलिसांपेक्षाही वरचढ
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह विविध राज्यातील गुन्हेगारी टोळय़ांचा बेळगाव परिसरात वावर असतो. या टोळय़ा एकदा घरातून बाहेर पडल्या की किमान सहा महिन्यांहून अधिक काळ घराबाहेरच असतात. या टोळीतील एखादा सदस्य त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे व लुटीतील ऐवज पोहोचविण्याचे काम सांभाळतो. अशा टोळय़ांचा पाठपुरावा करण्यासाठी व्यवस्थित खबऱयांचे जाळे पोलीस दलाजवळ असावे लागते. सद्यःपरिस्थितीत ही व्यवस्था मोडकळीस आल्याचे दिसून येते. त्यामुळेच गुन्हेगार पोलिसांपेक्षाही वरचढ ठरू लागले आहेत.
बेळगाव परिसरात दरोडेखोरांचा उच्छाद
मध्यंतरी मोबाईल शोरुम फोडणाऱया टोळीचा वावर वाढला होता. या टोळीत खासकरून पश्चिम बंगालमधील गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती मिळाली. खडेबाजार पोलीस स्थानकात झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले. एका, दोघांना अटकही झाली. मात्र, या संपूर्ण टोळीचा बिमोड झालाच नाही. आता पुन्हा बेळगाव परिसरात दरोडेखोरांचा उच्छाद वाढला आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांना पूर्ण क्षमतेनिशी कार्यरत व्हावे लागणार आहे. आजवर घडलेल्या गुन्हय़ांचा तपास करून सर्वसामान्यांना सुरक्षिततेचा भरवसा देण्याची गरज आहे.
उक्ती आणि कृतीत फरक!
सध्या बेळगाव शहरात कार्यरत असणाऱया अधिकाऱयांपैकी अनेक जणांना फोनचे वावडे आहे. कामानिमित्त सर्वसामान्य नागरिक त्यांना फोन करत असतात. अनेक जण फोन उचलणे टाळतात. उचलला तरी अरेरावीची उत्तरे दिली जातात. समस्या घेऊन पोलीस स्थानकात जाणाऱया नागरिकांशी सौजन्याने वागले जात नाही. पारदर्शकतेच्या नावाने अनेक वेळा कागदी घोडे नाचविले जातात. आता तर वेगवेगळय़ा ठिकाणी जनसंपर्क सभा घेऊन ‘तुमच्या समस्या असतील तर आमच्यासमोर मांडा’ असा मानभावीपणाचा सल्ला दिला जात आहे. काही अधिकाऱयांच्या हावरटपणामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस दलापासून अलिप्त राहात आहेत. अशा परिस्थितीमुळेच बेळगावात गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे.