चेन्नई / वृत्तसंस्था
राज्य सरकारने तयार केलेले भाषण जर राज्यपालांना वाचयचे नसेल तर त्यांनी काश्मीरमध्ये चालते व्हावे. नंतर आम्ही तेथे दहशतवादी पाठवू. ते दहशतवादी राज्यपालांचा खात्मा करतील, असा वादग्रस्त इशारा तामिळनाडूत सत्ताधारी द्रमुकचे नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सध्या आर. एन. रवी हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी राज्य सरकारने तयार केलेले भाषण वाचून दाखविले नव्हते असा आरोप करण्यात आला होता. राज्य सरकारच्या भाषणात राज्यपाल रवी यांनी काही परिवर्तन केले होते. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. कृष्णमूर्ती यांच्या बेजबाबदार विधानामुळे आता आगीत तेल ओतले गेले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कृष्णमूर्ती यांनी राज्यपालपदाची मानहानी केली आहे, आस आरोप भाजपने केला आहे. द्रमुकने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.