नंदगड : खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील बिडीपासून बेकवाड, झुंजवाडपर्यंतच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बिडी हे तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे. परिसरातील 50 गावांचा संपर्क या गावांशी येतो. शिवाय येथे महसूल केंद्र आहे. शाळा, दवाखाना व अन्य कामांसाठी येथे जनतेचा रोजचा संपर्क असतो. त्यामुळे बिडीला जाण्यासाठी हा रस्ता कुचकामी ठरला आहे. खानापूरहून कारवार, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, शिरशी धारवाड, हुबळीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. खानापूरपासून झुंजवाडपर्यंत काही ठिकाणी रस्ता बऱ्यापैकी करण्यात आला आहे. तर झुंजवाडपासून बिडीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा चरी पडल्या आहेत. या खड्यांमुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे.
Previous Articleनंदगड येथील संत मेलगे शाळेचे छप्पर नादुरुस्त
Next Article कडोलीत शिवजयंती मिरवणूक उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.