बनावट ओळखपत्रांद्वारे धाडीचे सत्र : मांडवलीसाठी मोठय़ा रकमेची मागणी, तीन महिन्यांत पाच प्रकरणांची नोंद, 13 जणांवर अटकेची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
यापूर्वी पोलीस, सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटणाऱया टोळय़ांचा वावर होता. आजही बेळगावसह जिल्हय़ातील वेगवेगळय़ा शहरात ही टोळी अधूनमधून आपले अस्तित्व दाखवून देत असते. आता पत्रकार असल्याचे सांगून लुटमारी करण्याचे प्रकार वाढले आहेत. केवळ तीन महिन्यांत जिल्हय़ात अशा चार घटना घडल्या आहेत.
शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी कोण्णूरहून हेब्बाळकडे जाणारी केए 22, डी 0557 क्रमांकाची ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. आपण पत्रकार आहोत, या ट्रकमध्ये रेशनच्या तांदळाची वाहतूक होत आहे, असे सांगत ही तपासणी झाली. चालक गुरुराज हुक्केरी, रा. नदीगुडी याला धक्काबुक्कीही करण्यात आली. प्रत्यक्षात या ट्रकमध्ये तांदूळ नव्हे तर जोंधळय़ाची वाहतूक करण्यात येत होती.
यमकनमर्डी पोलिसांनी या प्रकरणी किरण गायकवाड, संतोष दोडमनी, सचिन कांबळे, दादू लोखंडे या चौघा जणांना अटक केली आहे. वाहन तपासण्यासाठी हे चौघे जण कारमधून आले होते. खरेतर महामार्गावर ट्रक अडवून तपासणी करण्याचा त्यांना कोणता अधिकार आहे? ही ताजी घटना आहे.
19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.15 ते 9.22 या वेळेत अंबडगट्टी क्रॉसजवळ एक गुड्स वाहन अडवून 4 लाख 79 हजार 250 रुपये पळविण्यात आले होते. या प्रकरणी रामतीर्थनगर-बेळगाव येथील अताउल्ला मोहम्महयात होनगेकर हे अंडी खरेदीसाठी गुड्स वाहनातून कित्तूरजवळील एका पोल्ट्री फार्मला जाताना केए 22, पी 5752 क्रमांकाच्या कारमधून आलेल्या पाच जणांनी आपण पोलीस आहोत, असे सांगून वाहन तपासणीच्या नावाखाली रक्कम लुटली होती.
या प्रकरणी शनिवारी बेळगाव येथील पाच जणांना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. सेहल तरसगार, नईम मुल्ला, सर्वेश तुडयेकर, बसवराज पाटील, झाकीर मणियार अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून गुन्हय़ासाठी वापरलेली कार, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारमध्ये पत्रकार असल्याचे दाखविणारी दोन बनावट ओळखपत्रेही आढळून आली आहेत. या टोळीतील आणखी चौघे जण फरारी आहेत.
चालू महिन्याच्या सुरुवातीला 1 ऑगस्ट रोजी दुपारी निपाणी तालुक्मयातील कुर्ली येथे अशीच घटना घडली होती. आम्ही पत्रकार आहोत, तुमच्या घरात रेशन तांदळाचा साठा आहे, असे सांगत एकाकी महिला असलेल्या घरात चित्रिकरण करण्यात आले होते. या प्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात अमर कोडते, रा. घटप्रभा, गंगाधर शिरगावे, रा. बडकुंद्री, विवेकानंद कुदरीमठ, रा. घटप्रभा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गोकाक तालुक्मयातही अशा घटना घडल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांत विविध पोलीस स्थानकात पत्रकार असल्याचे सांगत दमदाटी, लुटमार केल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. या प्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
असे प्रकार उघडकीस आल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हय़ातील वरि÷ अधिकारी व पत्रकारांची बैठक झाली. तोतया पत्रकारांना आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पत्रकारांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हय़ाच्या ठिकाणी काम करणाऱया पत्रकारांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. दुसऱया टप्प्यात तालुक्मयाच्या ठिकाणीही ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.
शोध घेण्याची गरज
या घटना कशामुळे वाढत आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. हत्तरगी टोलनाक्मयापासून हिरेबागेवाडी टोलनाक्मयापर्यंत अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. महामार्गावरून जाणाऱया वाहनांवर त्यांची नजर असते. रेशन तांदळाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले तर ते वाहन अडवून मोठी रक्कम मागितली जाते. रक्कम न दिल्यास मारहाण केल्याचेही प्रकार घडले आहेत. अनेकवेळा पोलीस व सरकारी यंत्रणेला हाताशी धरूनच हा व्यवहार केला जातो. याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार असल्याचे सांगून काही जण वाहने अडवून तपास करतात. अशा प्रकरणांचे मूळ तस्करी व रेशन तांदळाच्या वाहतूक प्रकरणातच आहे. बेळगाव जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ महाराष्ट्रात जातो. सरकारी यंत्रणेने जर ही वाहतूक वाढविण्याचे ठरविले तर बऱयापैकी ते नियंत्रणात येऊ शकते. अन्नभाग्य योजनेतून सर्वसामान्य व गरीब कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत तांदूळ दिले जातात. त्या तांदळाची विक्री केली जात आहे.
पोलीस असल्याचे सांगून वृद्धांच्या गळय़ातील दागिने लांबविले जातात. आता पत्रकार असल्याचे सांगत महामार्गावर वाहने अडवून त्यांची लूट होत आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटना गांभीर्याने घेतल्या असून मूठभर तोतया पत्रकारांच्या प्रतापाने खऱया पत्रकारांनाही धर्मसंकटात लोटले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी तर अशा प्रकरणात गुंतलेल्यांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले आहेत.
वरि÷ पोलीस अधिकारी ऍक्शन मोडमध्ये
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी या जोडगोळीने वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचा सपाटाच सुरू केला आहे. केवळ आठ महिन्यांत 113 चोरी प्रकरणांचा छडा लावून 10 कोटी 73 लाख 6 हजार 565 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. डॉ. संजीव पाटील बेळगावला येण्याआधी कार्यरत असलेले पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांचाही कामाचा सपाटा वाखाणण्याजोगा होता.