अगसगे / वार्ताहर
लम्पीस्किन रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या बाजारासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यातून सुऊ आहे. मात्र अद्याप प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर शेतकरी व व्यापाऱ्याने चक्क एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारासमोरच्या गेट समोरच जनावरांचा बाजार भरवला.
लम्पीस्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून मार्केट यार्डमधील जनावरांचा बाजार प्रशासनाने बंद केला आहे. सध्या आता काही प्रमाणात हा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शिवाय या रोगाची लागण केवळ गोवर्गीय जनावरांना होत आहे. म्हैस जनावरांना या रोगाची लागण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे म्हैस जनावराचा बाजार सुऊ करावा, अशी मागणी कांही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतकरी आणि कांही जनावराच्या व्यापाऱ्यांनी जनावरांचा बाजार सुरू करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र अद्याप प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, दलाल, खरेदीदारांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री थांबली आहे. त्यामुळे उलाढालीवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. या जनावरांच्या बाजारात दर शनिवारी लाखो ऊपयांची उलाढाल होत असते. मात्र बाजार बंद असल्याने विव्रेते, व्यापारी शेतकरी अडचणीत आले आहेत. रब्बी हंगामासाठी पेरण्या व शेतीची कामे आली आहेत. कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी बैलाची गरज भासते. मात्र बाजारच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी कांही अडीअडचणीला गाभण म्हशीची विक्री करतात व कांही शेतकऱ्यांची जनावरे दूध देणे बंद केल्यास बाजारातून दुभत्या जनावरांची खरेदी केली जाते. यामुळे एकमेकांच्या समस्या दूर होतात. मात्र गेल्या चार पाच महिन्यापासून मार्केट यार्डमधील बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी शनिवारी स्वच्छेने एपीएमसीच्या प्रवेशद्वाराजवळ जनावरांचा बाजार भरवला. या बाजारात म्हशीची संख्या कमी असल्या तरी खरेदी विक्रीला सुऊवात झाली. त्यामुळे कांहीसा दिलासा मिळाला. मागील चार पाच महिन्यापासून बंद असलेल्या जनावरांच्या बाजारात आता जनावरांच्या बाजाराला सुऊवात झाली आहे. येत्या पुढच्या बाजारापासून जनावरांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यातून व दलालातून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय प्रशासनाने आम्हाला रितसर म्हैस जनावरांच्या बाजार भरवण्यासाठी तरी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी दलाल व्यापाऱ्यातून होत आहे.
प्रशासनाच्या कारभाराबद्दल वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी शनिवारी एपीएमसीच्या भाजी मार्केटसमोर म्हैस जनावरांचा बाजार भरवून बाजारास प्रारंभ करण्यात आला आहे. या बाजारास कितपत यश मिळते याकडे पाहावे लागणार आहे.