आरबीआय योजना आखण्याच्या तयारीत ः 8 राज्यांमध्ये सर्वाधिक रक्कम
नवी दिल्ली
एका बाजुला महागाईच्या दरम्यान लोकांमध्ये पैसे वाचवून ठेवण्याची काटकसर सुरु आहे. तसेच दुसऱया बाजूला मात्र देशातील बँकांमध्ये कोटय़वधी रुपयांची रक्कम पडून राहिलेली असून त्यांचा वारस कोणीही नसल्याचे समोर आले आहे. याकरीता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून बँकांमध्ये पडून राहिलेल्या रक्कमेकरीता एक अभियान सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.
देशातील जवळपास 8 राज्यांमधील बँकांमध्ये या प्रकारची रक्कम सर्वाधिक पडून राहिली असल्याची माहिती आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार वर्ष 2020-21 मध्ये बँकांमध्ये पडून असलेली रक्कम (अनक्लेमड मनी) 39,264 कोटी रुपये होती. तसेच आर्थिक वर्ष 2021-22मध्ये बँकांमध्ये विना दाव्याची रक्कम वधारुन 48,262 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये विना दाव्याची जमा असलेल्या रक्कमेचे खरे दावेदार कोण त्याचा शोध घेण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरु करण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
10 वर्षांत देवाणघेवाण न केल्यास खाते बंद
पेंद्रीय बँकेच्या नियमानुसार बचत व चालू खात्यांमध्ये 10 वर्षात सलगपणे कोणत्याही प्राकारची देवाणघेवाण न केल्यास किंवा यामध्ये मुदतबंद ठेव व ज्यामध्ये मॅच्युरिटी झाल्यानंतर 10 वर्षांनंतर कोणत्याही प्रकारचा दावा केला नाही तर तेव्हा अनक्लेमड मनी असे मानणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
खाते इनऍक्टिव झाल्यावर व्याज राहणार सुरु
आरबीआयच्या माहितीनुसार या रक्कमेला कोणीही दावेदार मिळाला नसल्यास मात्र यानंतरही व्याज सुरुच राहते. यामध्ये कोणीही संबंधीत बँकेत जाऊन खात्याला पुन्हा एकदा सुरु करुन व्याजासह आपली रक्कम काढू शकतो. मात्र यावर बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की या प्रकारच्या जागरुकता अभियानाने विना दाव्यांच्या रक्कमेला खरा मालक मिळालेला नाही. ज्यामुळे वर्षाकाठी या प्रकारच्या खात्यांची रक्कम वाढत असल्याचेही सांगितले आहे.
या 8 राज्यांमध्ये सर्वाधिक खात्यांमध्ये रक्कम
आरबीआयच्या माहितीनुसार देशातील 8 राज्यांमध्ये विना दाव्याची रक्कम सर्वाधिक आहे. यामध्ये समावेश असणाऱया राज्यांमध्ये तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा व आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.