केंद्रीय कृषिमंत्रालयाकडून अंतरिम अनुमान ः 315.72 दशलक्ष टनावर पोहोचणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे गव्हाचे उत्पादन सुमारे 3 टक्क्यांनी कमी होत 106.84 दशलक्ष टन राहण्याचा अनुमान आहे. तर पीक वर्ष 2021-22 मध्ये अन्नधान्याचे एकूण उत्पादन विक्रमी 315.72 दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. पंजाब आणि हरियाणात उष्णतावाढीमुळे गव्हाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक वर्ष 2021-22 साठी चौथा अंतरिम अनुमान बुधवारी जारी केला आहे. तांदूळ, मका, चणाडाळ, डाळ, ऊसाठी विक्रमी उत्पादनाचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. पीक वर्ष जुलै 2021 पासून जून 2022 पर्यंत मानण्यात आले आहे. मंत्रालयानुसार जून 2022 मध्ये समाप्त पीक वर्षात देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन विक्रमी 315.72 दशलक्ष टन राहण्याचा अनुमान आहे. पिकांचे विक्रमी उत्पादन सरकारची शेतकऱयांचे हित साधणाऱया धोरणांसह शेतकरी तसेच वैज्ञानिकांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
गहू, तांदूळ, डाळी आणि कडधान्याचे उत्पादन 2020-21 या पीक वर्षात 310.74 दशलक्ष टन राहिले. 2020-21 या पीक वर्षात गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन होण्याचा अनुमान आहे. मागील वर्षात हा आकडा 109.59 दशलक्ष टन इतका होता. तर तांदळाचे उत्पादन विक्रमी 130.29 दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अनुमान आहे. यापूर्वीच्या पीक वर्षात हे प्रमाण 124.37 दशलक्ष टन इतके हेते.
कडधान्याचे उत्पादन 51.32 दशलक्ष टनावरून कमी होत 50.90 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. डाळींचे उत्पादन 27.69 दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अनुमान आहे. ऊसाचे उत्पादन मागील वर्षाच्या 405.39 दशलक्ष टनाच्या तुलनेत 431.8 दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. तर कापसाचे उत्पादनही यंदा कमी होण्याचा अनुमान व्यक्त होत आहे.