ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी फोन केला होता. राज ठाकरे यांनीही मविआच्या नेत्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, भाजपने कोल्हापूर आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नव्हती. एक अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे भाजपने डोक्मयातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील. त्यामुळे कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही.
अधिक वाचा : जो उमदेपणा भाजपने दाखवला; तो आता मविआने दाखवावा
कसबा आणि चिंचवडसाठी मविआचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. कसब्याची जागा काँग्रेस लढणार आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, या जागेवर शिवसेनाही आग्रही आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.