आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला सहानभूमीमुळे गर्दी होतेय; आमच्यातले कोणीही जाणार नाही, भाजपाने अफवा पेरल्या आहेत; सामान्यांच्या प्रश्नावर कॉँग्रेसची लढाई देशात सुरु आहे; गोकूळच्या निवडणूकीवर बोलण्यास नकार
सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे. विस्तार खूप मोठा आहे. गोव्यासारखा नाही. दोघांनी राज्य चालवायला. किमान दोन्ही गटाचे पाच पाच किंवा 11 चे मंत्रीमंडळ आतापर्यंत करायला हवे होते, अशा शब्दात काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी परखड मत व्यक्त केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला सहानभूतीमुळे गर्दी होत आहे. त्यांच्याशी ज्या पद्धतीने भाजपा आणि शिंदे गट वागला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सभांना उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे कोणीही त्यांच्याही सभेला गेलेले नाही, असे सांगत काँग्रेस सामान्यांच्या प्रश्नावर लढाई देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आझादी गौरव यात्रेच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, मनोहर शिंदे, नरेश देसाई, ऍड.दत्तात्रय धनावडे, विजय कणसे, राजेंद्र शेलार, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, अन्वर पाशा खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसचे जयपूरला संकल्प शिबिर झाले. तेथे जो संकल्प करण्यात आला होता. तोच शिर्डी येथे संकल्प शिबिर झाले. तेथे दिलेल्या सुचनेनुसार दि. 9 ते 15 ऑगस्ट आझादी का गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. जिह्यातही 75 किलोमीटर ही यात्रा होणार आहे. माणमध्ये गेंदवले ते दहिवडी, खटावमध्ये वडूज, कोरेगावमध्ये कुमठे ते हुतात्मा स्मारक, सातारा येथे वडूथ ते वाढे फाटा, फाशीचा वड ते हुतात्मा स्मारक, फलटण येथे जिंती नाका ते पंडित नेहरु पुतळा, वाई येथे कवठे ते केंजळ, जावली कुडाळ ते बामणोली, पाटण कुंभारगाव ते ढेबेवाडी, कराडमध्ये मलकापूर ते कोळे, विरंगुळा बंगला ते मंगळवार पेठ, महाबळेश्वरमध्ये एसटी स्टॅण्ड ते पंचायत समिती, खंडाळा अशी काढण्यात येणार आहे.