ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, लोकांची गर्जना काय आहे, काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना. डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नसून ते चोरमंडळ आहे, असा हल्लाबोल खा. संजय राऊत यांनी कोल्हापुरात केला.
राऊत म्हणाले, कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे, हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेत संदर्भात चर्चा सुरू आहे. सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली. पण दुसरीकडे जो जाब विचारतो, त्याला तुरुंगात टाकायचे खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचे असे षडयंत्र रचले जात आहे, पण जनता 2024 ला याचा सर्व हिशोब करेल. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरुन काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे.
INS विक्रांतसाठी जमा केलेला पैसा सोमय्यांनी कुठे ठेवला?
INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोराने म्हणजे किरीट सोमय्याने लाखो-करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत: विक्रांतचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे, त्यासाठी न्यायालयातही जाणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं.
अधिक वाचा : LPG गॅस सिलिंडर महागला