प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वे गेट परिसरात रविवारी सायंकाळी तब्बल 25 मिनिटे रेल्वे थांबल्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजुने वाहतुक कोंडी झाली होती. वाहनचालक रेल्वेगेट नजीक अडकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. वारंवार रेल्वे थांबण्याची समस्या जाणवत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
रविवारी सायंकाळी 5.25 वा. म्हैसूर -दादर शरावती एक्सप्रेस टिळकवाडी पाfरसरात दाखल झाल्यानंतर थांबली. पुढील सिग्नल मिळत नसल्याने बराच काळ एक्सप्रेस जाग्यवरच होती. एक्सप्रेस येण्यापूर्वी पाfहले व दुसरे रेल्वेगेट बंद करण्यात आल्याने रेल्वे गेटच्या दोन्ही बाजुनी वाहनचालक अडकले होते. बराचवेळ झाला तरी रेल्वे पुढे सरकत नसल्याने रेल्वे का थांबली याची चर्चा सुरू होती. तब्बल 25 मिनिटांनी सिग्नल मिळाल्यानंतर एक्सप्रेस रेल्वे स्थानकात दाखल झाली. रेल्वेगेट बराचवेळ बंद असल्याने इतर मार्गानी नागरिकांनी पुढे जाणे पसंत केले.
पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात रेल्वे थांबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वीही तीन ते चार वेळा रेल्वे थांबल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. रेल्वे स्थानकातtन सिग्नल मिळत नसल्याने रेल्वे थांबत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात येत असली तरी हि समस्या कायमची सोडवावी अशी मागणी केली जात आहे.