जिह्यात 2 हजार 211 दुर्गा मंडळे करणार दुर्गा मातेची प्रतिष्ठापना होणार
प्रतिनिधी/ सातारा
दोन वर्षानंतर दुर्गा उत्सव पुन्हा त्यांच्या उत्साहाने साजरा करण्यासाठी सातारकर पुन्हा सज्ज झाले आहेत. दुर्गा उत्सवाची तयारी जिह्यात दुर्गा मंडळांनी केलेली असून दुर्गा मातेची प्रतिष्ठापना सातारा शहरातील 72 मंडळांकडून तर जिह्यातील 2 हजार 211 मंडळांकडून करण्यात येणार आहे. दुर्गा मातेची मिरवणूक काढण्यासाठी पारंपारिक वाद्यांना पसंदी दिली जात आहे. दरम्यान, घटाची स्थापना करण्यासाठी बाजार पेठेत मातीचे घट, माती विक्रीला आलेली होती.
सातारा जिह्यात यावर्षी कोरोनाच्या दोन वर्षाच्या दिर्घ कालावधीनंतर दुर्गा उत्सव होणार आहे. त्याकरता जिह्यातील गावागावात अमाप उत्साह पहायला मिळत आहे. दुर्गा उत्सवाला सातारा जिह्यात एक वेगळे महत्व आहे. प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळया परंपरा दुर्गाउत्सवाच्या आहेत. 9 दिवस उपवास व घटस्थापना मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. कोरोना काळात काहीसे निर्बंध होते. यावर्षी सर्व काही मुक्त झाल्याने पुन्हा त्याच उत्साहाने हा उत्सव साजरा होत आहे. सातारा शहरातील मोती चौक ते सदाशिव पेठेपर्यंत व राजवाडय़ाच्या गोलबागेजवळ घटस्थापनेची माती विक्रीची दुकाने लागली होती. घट व इतर साहित्य लागणारी दुकाने दिसत होती. खाऊच्या पानाची दुकाने मोठया प्रमाणावर दिसत होती. दरम्यान, मातीच्या घटाची किमत 50 रुपयांपासून पुढे तर माती 20 रुपयापासून पुढे विक्रीला होत होती. उपवासाच्या खारीक, खजूर या पदार्थाची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली असून त्यांना मोठी मागणी आहे.
सातारा जिह्यात यावर्षी दुर्गा उत्सव मंडळांकडून तयारी करण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 42 दुर्गा उत्सव मंडळांनी नोंदणी केली आहे. तर शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 मंडळांनी नोंदणी केली आहे. तसेच जिह्यातून 2 हजार 211 दुर्गा माता मंडळांनी नोंदणी केली आहे. दुर्गा माता मंडळांकडून सोमवारी सकाळपासून आगमन मिरवणूका निघणार असून त्याकरता पारंपारिक वाद्यांना पसंती दिली आहे. मुहूर्तावर दुर्गा मातेची प्रतिष्ठापना आणि घट बसवण्याचा कार्यक्रम करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
पोलिसांकडून कडक बंदोबस्त
सातारा जिह्यात दुर्गाउत्सव व नवरात्रोउत्सव काळात कुठेही गालबोट लागू नये, शांततेत हा उत्सव साजरा करता यावा करता सातारा पोलिसांकडून ठिकठिकाणी दुर्गा उत्सव मंडळांच्या व गरबा आयोजकांच्या बैठका घेवून सक्त सुचना दिल्या आहेत. तसेच मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरवर्तन व चुकीचे प्रकार होत असल्याची बाब निदर्शनास येताच त्यांच्यावर कडक कारवाई पोलिसांकडून होणार आहे.