शेतकऱयांनी पीक विमा भरावा, कृषी खात्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. या अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई दिली जाणार आहे. मात्र या योजनेला शेतकऱयांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यंदा खरीपातील भात पिकाचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै असल्याने केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी विमा योजना करून घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात घेण्यात येणाऱया विविध पिकांना शासनाकडून संरक्षण देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती, कीड व इतर संकटकाळात या योजनेतून शेतकऱयांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. खरीप हंगामात भात, बटाटा, सोयाबिन, भुईमूग, तंबाखू इतर पिकांची लागवड आणि पेरणी झाली आहे. मात्र सुक्या आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांची हानी होत असते. अशा परिस्थितीत ही पीक योजना आधार ठरणार आहे.
शासनाची महत्त्वाकांक्षी योजना
शेतकऱयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत विविध पिकांचा विमा भरता येतो. त्यामुळे पिकांना संरक्षण मिळणार आहे. मागील दोन तीन वर्षात अतिपावसामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. पूरपरिस्थिती निर्माण होऊन पिके पाण्याखाली गेली होती. अशा कठीण काळात नुकसान भरपाई म्हणून या योजनेचा शेतकऱयांना आधार मिळणार आहे.
पीक विमा शेतकऱयांना आधार
पीक विमा भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. ज्या शेतकऱयांनी पीक विमा भरला नाही. त्यांनी तातडीने पीक विमा भरावा, आपत्त्कालीन परिस्थितीत पीक विमा शेतकऱयांना आधार ठरणार आहे. नैसर्गिक आपत्ती कधीही ओढवू शकते. अशा परिस्थितीत केवळ पीक विमाच शेतकऱयांना आधार ठरू शकतो.
– शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक कृषी खाते)