अटक टाळण्यासाठी 17 लाखांची मागणी
वृत्तसंस्था /जयपूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने इंफाळमधील अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) एका अधिकाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्याला तक्रारदाराकडून 15 लाख ऊपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. चिटफंड प्रकरणातील आरोपींना अटक न करण्याच्या बदल्यात आरोपींकडून 17 लाख ऊपयांची लाच मागितल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंफाळमधील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात नोंदवलेल्या चिटफंड प्रकरणात मालमत्ता जप्त करू नये आणि अटक न करण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी नवलकिशोर मीणा यांनी आपल्याकडे 17 लाख ऊपयांची लाच मागितली होती, अशी तक्रार तक्रारदाराने केली होती. त्यानुसार सापळा रचून ईडी अधिकाऱ्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली.
एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी नवलकिशोर मीणा याला त्याचा सहकारी बाबूलाल मीणा उर्फ दिनेश मार्फत तक्रारदाराकडून 15 लाख ऊपयांची लाच घेताना गुऊवारी जयपूर येथे अटक केली. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारने एसीबीला दिले आहेत. यासंदर्भात राज्य विधानसभेत कायदा करण्यात आल्यामुळेच एसीबीने अंमलबजावणी संचालनालयातील कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे.