ऑनलाईन टीम/तरारून भारत
न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बारा दिवसांनी न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत.
२३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. २४ रोजी न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत होते. आज राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीला झाली. यावेळी न्यायालयाने काही अटी आणि शर्ती घालत राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. १२ दिवसांनी राणा दाम्पत्याला जामीन मिळाला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिला होता. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षत घेता राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.